शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस,सोयाबीनला विमा संरक्षण

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यात या वर्षातील खरीप हंगामापासून प्रायोगित तत्त्वावर विमा योजना राबविण्यात येत असून मूग, उडीद, सोयाबीनसह कापूस या पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे.

रामेश्वर काकडे , नांदेडजिल्ह्यात या वर्षातील खरीप हंगामापासून प्रायोगित तत्त्वावर विमा योजना राबविण्यात येत असून मूग, उडीद, सोयाबीनसह कापूस या पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना सुरक्षितता मिळणार आहे. तृणधान्ये, कडधान्य, गळीतधान्य व नगदी पिकांच्या उत्पादनावर खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने पीक विमा कार्यक्रमातंर्गत हवामान आधारित पीक विमा योजना पथदर्शक स्वरुपात राबविण्यात येत आहे. यात नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या संदर्भीय मार्गदर्शक सूचनेनुसार अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून संरक्षण देणारी हवामान आधारिक पीक विमा योजना खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या ७ पिकासाठी राज्यातील निवडक १२ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.या योजनेत नांदेड जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या अधिसूचित पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीक पेरल्यापासून पीक हातात पडण्याच्या कालावधीत अत्यल्प पाऊस पडणे, पावसात खंड पडणे तसेच अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाल्यास योजनेच्या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य देणे. पिकाच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आदी या योजनेचे मुख्य उद्देश आहेत. विविध वित्तीय संस्थाकडून अधिसूचित पिकांसाठी पीककर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांस सक्तीची राहील. विगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे. विमा योनजेतंर्गत शेतकऱ्यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम संबंधित विमा कंपनीमार्फत अदा करण्यात येईल.अधिसूचित क्षेत्रात महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्यासाठी नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलित संदर्भ केंद्र उभारणी करण्याबाबत संबंधित विमा कंनपीकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.कर्जदारासाठी सक्तीचीकर्जदार शेतकऱ्यासांठी ही योजना अधिसूचित पिकासाठी सक्तीची राहणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमागणीच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या पिकासाठी तसेच त्यावर दिलेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेणे बंधनकारक राहील. कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक नियोजनामध्ये काही बदल झाल्यास पेरणीनंतर एक आठवड्याच्या आत संबंधित बँकेस त्यासंदर्भात माहिती द्यावयाची आहे.बिगरकर्जदारांचा सहभागबिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षण कालावधी सुरु होण्यापूर्वी विमा योजनेत सहभाग घेणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी प्राधिकृत केलेल्या बँकेत शेतकऱ्यांनी स्वतंत्र खाते उघडावे, बँकेत किंवा विमा प्रतिनिधींच्यामार्फत विम्याचा प्रस्ताव सादर करावा. विमा प्रस्तावामाध्ये आपल्या जमिनीचा सर्वे नंबर नमूद करावा, जमिनीचा पुरावा म्हणून सातबारा उतारा, पेरणी केल्याचे प्रमाणपत्र विमा प्रस्तावासोबत देणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील अधिसूचित पिके, क्षेत्र, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर असा राहील.जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मुग, उडिद या चार पिकासांठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. कापसासाठी भरावयाच्या एकूण विमा हप्त्यापैकी शेतकरी हिस्सा ९५० रुपये, केंद्र शासन ३१६, राज्य शासन ३१६ रुपये अनुदान म्हणून शासन भरणार आहे.सोयाबीनसाठी भरावयाच्या विमा हप्त्यापैकी शेतकरी ९२३, केंद्र ४५९ रुपये, राज्य ४५९ रुपये याप्रमाणे विमा हप्ता अनुदान देय आहे.मुग या पिकासाठी १०२० रुपये हप्ता भरावयाचा असून त्यापैकी शेतकरी हिस्सा ६१२, केंद्र २०४, राज्य २०४ रुपये आहे. उडिदासाठी भरावयाच्या १५१२ रुपये हप्त्यापैकी शेतकऱ्यांने ७५६ रुपये भरायचे असून केंद्र शासन ३७८ तर राज्य शासन ३७८ रुपये अनुदान म्हणून भरणार आहे. सदर विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जून २०१४ ही शेवटची मुदत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतल्यास पिकांना आपत्तीपासून संरक्षण मिळेल.