शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

टँकरवर सर्वाधिक १७ कोटी खर्च

By admin | Updated: September 7, 2014 00:36 IST

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला.

औरंगाबाद : चालू आठवड्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. एप्रिलपासून आॅगस्टअखेरपर्यंत म्हणजे गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात टँकर आणि विहीर अधिग्रहणासह इतर उपाययोजनांवर तब्बल १९ कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १७ कोटी रुपये टँकरवर खर्च झाले आहेत.औरंगाबाद जिल्ह्यास यंदा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. जानेवारी महिन्यापासून अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. याशिवाय ठिकठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. तसेच नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पूरक नळ योजना राबविणे आदी उपाययोजनाही केल्या जात होत्या. मार्चपासून टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या सातत्याने वाढत गेली. जुलैमध्ये जिल्ह्यात अडीचशे गावांना तब्बल ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय साडेतीनशे गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. मात्र, आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सलग चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याचे आटलेले स्रोत पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद झाले. एकट्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर ७ कोटी रुपयांचा खर्च झाला. तर एप्रिलपासून ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात टंचाई निवारणावर १९ कोटी ६९ लाख रुपये खर्च झाले आहेत.