शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेसचा उंचावता आलेख

By admin | Updated: September 29, 2014 00:49 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची प्रगती स्थिर असून, भाजपाचा मात्र सफाया झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही गतनिवडणुकीत खाते उघडले आहे. २००९ च्या आधी १९८० पासून जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ नंतर जिल्ह्यात नऊ मतदारसंघ अस्तित्वात आले. १९९५ सालच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आले. वैजापूर आणि कन्नड या दोन जागा काँग्रेसकडे होत्या. सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या जागा भाजपाने जिंकल्या. तर औरंगाबाद पश्चिम आणि पैठणमध्ये शिवसेनेने विजय मिळविला, तर गंगापूरमध्ये अपक्षाने बाजी मारली. राज्यात युतीची सत्ता आली तर जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाची समान शक्ती राहिली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दोन काँग्रेसविरुद्ध शिवसेना- भाजपा युती अशी लढत झाली. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची आघाडी होऊन आघाडीची सत्ता आली. यावेळीही जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. तर भाजपाने सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या आपल्या दोन जागा कायम राखल्या. वैजापूर मतदारसंघ काँग्रेसने गमावला; परंतु औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ खेचून घेतला. वैजापूरसह गंगापूर आणि पैठण या तीन ठिकाणी विजय मिळविला. २००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. यावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१ जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध केले. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. वैजापूर, गंगापूर, पैठणसह कन्नडची जागा शिवसेनेने खेचली. तर काँग्रेसने कन्नडची जागा गमावून औरंगाबाद पूर्वची जागा जिंकली. भाजपाला केवळ सिल्लोडच्या जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीपासून जिल्ह्यात भाजपाची पीछेहाट सुरू झाली. तिन्ही निवडणुकांत काँग्रेस पक्ष स्थिर राहिला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नऊ मतदारसंघांपैकी २००९ मध्ये काँग्रेसने तीन जागा जिंकून आपला आलेख उंचावला. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड याठिकाणी विजय मिळविला. तर वैजापूर आणि औरंगाबाद पश्चिम या दोन जागा शिवसेनेला मिळाल्या. पैठणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. कन्नडची जागा मनसेच्या पदरात पडली, तर औरंगाबाद मध्य आणि गंगापूर मतदारसंघात अपक्षांनी बाजी मारली. या निवडणुकीत शिवसेनेला मात्र जोरदार फटका बसला. जिल्ह्यात दोन मतदारसंघ वाढले असताना शिवसेनेच्या आमदारांची संख्या चारवरून दोनवर आली, तर भाजपाचा पूर्ण सफाया झाला, तर काँग्रेसने तीन जागा मिळवीत वर्चस्व सिद्ध केले.