शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माघारीसाठी रात्रभर मनधरणी

By admin | Updated: October 1, 2014 00:40 IST

औरंगाबाद : नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी आजची सहावी माळ राजकीय वर्तुळात लक्षात राहणारी ठरली.

औरंगाबाद : नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी आजची सहावी माळ राजकीय वर्तुळात लक्षात राहणारी ठरली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे या प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आणल्यामुळे एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला सुरुंग लागला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, तर थोड्याफार मतांचा फायदा होईल. या अनुषंगाने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने नवरात्रात जागरण केले. माघार घेण्यासाठी ३० सप्टेंबरच्या रात्रभर उमेदवारांच्या मागे अक्षरश: धावाधाव सुरू होती.
१ आॅक्टोबर हा दिवस उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सहाव्या माळेच्या रात्रीत ज्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली, ते बुधवारी अर्ज मागे घेतील, असाच त्याचा सरळसरळ अर्थ होईल.
तो अपक्ष उमेदवार याच्या संपर्कात आहे, तर तो उमेदवार अमुकअमुक उमेदवाराच्या संपर्कात आहे. फलाणा उमेदवार त्यांच्या घरी आहे. याची त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यांची बोलणी फिसकटली आहे. त्याला तर साहेबांचा फोन आला होता म्हणे, या व अशा खमंग, रंगतदार चर्चा बहुतांश सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यालयात आज सुरू होत्या.
अपक्ष, बंडखोर, विशिष्ट समाजाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून उद्या १ आॅक्टोबर रोजी माघार घ्यावी, यासाठी आज रात्रभर शहराबाहेर ‘ऊठबशी’चे राजकारण सुरू होते. लग्नाच्या देवाण-घेवाणीवरून होणाऱ्या बैठकीत जसे रुसवे-फुगवे होतात, त्याप्रमाणे ‘वर’ पक्षाच्या भूमिकेत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी अनेक उमेदवारांना कात्रीत पकडले होते.
आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकपद देण्याचा शब्दही अनेकांना देण्यात आला. पहाटेपर्यंत बंडोबांना थंड करण्यासाठी या ना त्या मध्यस्थामार्फत प्रयत्न सुरू होते. नऊ मतदारसंघांत कोणाच्या गळाला किती मासे लागले. याचे उत्तर १ आॅक्टोबर रोजी मिळणार आहे.