शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भावांनी केले पारधीवाड्याचे नाव रोशन

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

भास्कर लांडे, हिंगोली जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी जातीत झालेला जन्म आणि घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं.

भास्कर लांडे, हिंगोलीजन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी जातीत झालेला जन्म आणि घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं. तशात वडिलाचं छत्र बालपणीच हरवलं. परिस्थितीमुळं दिवसभराच्या कामानंतरच घरी चूल पेटायची. नेहमी दोन वेळच्या खाण्याचे वांधे होते. परिणामी शिक्षणाचा विषय कोसोमैल दूर होता; पण गरिबीचे चटके अधिक सोसलेल्या आईने हातात फावड्याऐवजी पेन दिली. पुढे शिक्षणातही रफरफ झाली. कधी पुस्तके नव्हती तर कधी बससाठी पैसे नव्हते; पण हिंमत हरली नव्हती. अशा विपरित परिस्थितीत खाकी वर्दीचे ध्येय उराशी बाळगून सरावासाठी दिवसरात्र एक केला. त्याचे फलस्वरूप पहिल्याच भरतीत पप्पू रामसिंग काळे यशस्वी झाला. त्याच्या प्रेरणेने आणि एकत्र सरावाने चुलत भावाने सोबतच यशोशिखर गाठले. दोघांची आनंद वार्ता घरी कळताच पप्पूच्या आईच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. ‘पारधीवाड्याचे नाव रोशन केल्याचे सांगत’ आई बायनाबाई काळे यांनी आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली. महाराष्ट्रातील संत नामदेव यांच्या जन्मस्थानामुळे नर्सी गावाचे नाव भारतभर पोहोचले आहे. याच गावातील काळे कुटुंबियांतील दोन युवकांनी पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुळात भटकंती करणारा पारधी समाज असल्यामुळे स्थावर मालमत्तेचा विषयच नव्हता. परिणामी पिढ्यान्पिढ्या घरात अठराविश्व दारिद्र्य होते. बिकट परिस्थितीत जन्मलेल्या पप्पू काळे याचे वडील लवकर जग सोडून निघून गेले. आपसूकच कुटुंबाचा पूर्णत: बोजा बायनाबाई काळे यांच्यावर येवून पडला. तशात शेती नव्हती, घरात धान्य नव्हते. दोनवेळच्या खाण्याचे मोठे वांधे होते; पण गरिबीचे चटके सहन करीत आलेल्या बायनाबार्इंनी मुलगा पप्पूच्या हातात फावड्याऐवजी पेन दिली. अडाणी बायनाबाई पप्पूला ‘काही तरी बन, बदल घडीव, घरात चांगले दिवस आण’ असे नेहमी सांगत होती. अगदी अशीच परिस्थिती संजू हरी काळे (वय २१) याच्या घरीही होती. दरम्यान, दहावी निघून गेली, अकरावीसाठी पप्पू आणि संजूने हिंगोली गाठली; परंतु विद्याशाखा, विषय निवडायचे ज्ञान नव्हते, कोणाचे मार्गदर्शन नव्हते. प्रवाहाप्रमाणे कला शाखा निवडली. कॉलेजचे दिवस सुरू झाले; मात्र नर्सीतून नियमित ये-जा करण्यासाठी पैसाही नव्हता. परिणामी दोन-दोन दिवस कॉलेजचे तोंड पहायला मिळत नव्हते. त्यातच सकाळी एकदा जेवून आल्यानंतर पोटात दिवसभर अन्नाचा कण नसायचा. दिवसभराच्या कॉलेजनंतर घरी गेल्यावर जेवण मिळायचे. दरम्यान अभ्यासात सातत्य राहिले नसल्याने बारावीला अपेक्षित टक्केवारी आली नाही; परंतु आईचा उपदेश थांबलेला नव्हता. काय करावे, या विचारात असताना आदर्श कॉलेजच्या मैदानावर सराव करताना बहुतांश मुले दिसून आली आणि खाकी वर्दी अंगावर चढवायची, हे ध्येय निश्चित झाले. मार्ग सापडला पण अडचणी संपल्या नव्हत्या. भरतीच्या सरावासाठी गोळा नव्हता, ट्रॅक नव्हता, शूजचा प्रश्न तर यक्ष प्रश्न होता. कोणतेही साधन नसताना दोघांनी नर्सी येथेच सराव सुरू केला. दोघांची मेहनत, जिद्द, चिकाटी पाहून सपोनि अशोक जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य विक्रम जावळे यांनी पुस्तके दिली. नेत्रतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार यांनी ट्रॅकसूट आणि शूज दिला आणि तेव्हापासून सरावाला गती मिळाली. भरतीची तारीख निघाली. दोघांनी सोबतच सातारा येथे फॉर्म भरला. भरतीत उंची मापली, गोळा फेकला, लांब उडी ठोकली आणि ५ किलो मीटर धावण्यात पहिला क्रमांक पटाकावला. ९० मार्काचे मैदान मारले, लेखी परीक्षेचा पेपरही दोघांनी उत्तम सोडविला. काही दिवसानंतर आॅनलाईन निकाल लागला. दोघांनी नेटकॅफे गाठून लिस्ट पाहिली. एकापाठोपाठ दोघांचे नंबर पाहताच पप्पू आणि संजूला जग जिंकल्यासारखे झाले. मोबाईल उचलला आणि आईला लावला. दोघेही सातारा येथील भरतीत यशस्वी झाल्याचे सांगताच बायनाबाईला काहीही शब्द सुचले नाहीत. त्या थेट रडायला लागल्या. मुलांच्या शिक्षणासाठी वेचलेले आयुष्याचे फळ मिळाले. रात्रंदिवस एक केलेल्या कष्टाचे चीज केले. डोळ्यातील आनंदाश्रू संपल्यानंतर ‘ तू पारधीवाड्यात पहिला नंबर आणलास, समद्या पारधीवाड्याचं नाव रोशन केलंस’ असे शब्द आईने काढल्याचे पप्पू काळे याने सांगितले.