शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यास गारपीटग्रस्तांना मोठी मदत

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे.

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे. मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्याने फक्त नऊशे कोटी रुपये देऊन गारपीटग्रस्तांची थट्टा केल्याचे सांगतानाच एनडीएचे सरकार येताच केंद्राकडून राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मोठी आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ त्यानंतर प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मुंडे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत जावई अमित पालवे, गौरव खाडे उपस्थित होते. राज्यात दलित अत्याचारात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसातच दलित अत्याचाराच्या ३० घटना घडल्याचे सांगत, राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १६५० दलित अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती मुंडे यांनी दिली. अत्याचारातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत, यावरुन सरकार गुन्हेगारास शिक्षा देण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात कायद्याचा वचक राहिला नसल्याने रॉकेल, वाळू माफिया यांचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेबरोबर कर्मचारी, अधिकारीही या राज्यात सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, उस्मानाबादचे माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, संजय निंबाळकर यांच्यासह विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, विकास मलबा, महानंदा पैलवान, दत्ता राजमाने, प्रभाकर मुळे, सचिन रसाळ, बाळा शामराज, श्रीकांत हिरोळीकर, उमेश गवते, विपीन शिंदे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर) मराठवाड्यातील आठही जागा जिंकू-मुंडे लोकसभा निवडणुकीत एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार असून, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हातील असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाला २३० ते २४० जागा मिळतील तर महाराष्ट्रात महायुतीस ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील आठही जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.