शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

सायकलींचे अनुदान अद्यापही गुलदस्त्यातच

By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST

बदनापूर : तालुक्यातील शाळा सुरु पंधरा दिवस झाले.अद्यापही या तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकासमधील सायकलींचे अनुदान मिळालेले नाही.

बदनापूर : तालुक्यातील शाळा सुरु पंधरा दिवस झाले.अद्यापही या तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकासमधील सायकलींचे अनुदान मिळालेले नाही.शासनाने ज्या गावातील शालेय विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता मानव विकासची बससेवा मिळत नाही. त्यांना शाळेत पायपीट करीत जावे लागते.विद्यार्थिनींना एका सायकलसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बदनापूर तालुक्यातील सुमारे ५५० विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. यापैकी दोन हजार रूपये तातडीने संबंधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. एक हजार रूपये सायकल खरेदी केल्याची पावती दाखविल्यानंतर देण्यात येणार आहेत.गेल्या दोन वर्षापासून जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर सायकल खरेदी करण्याच्या युक्तीवादानंतर अखेर मुलींना नगदी स्वरूपात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र या शासन निर्णयाची अंमलबजावणी संथ गतीने होत आहे. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी सुध्दा मुलींना सायकल खरेदी करण्याकरिता निधी मिळालेला नाही. याविषयी गटशिक्षणाधिकारी आर. बी. वाणी म्हणाले की, हा शासननिर्णय पूर्वीचा असला तरी या योजनेकरीता निधी आलेला नव्हता आता निधी आला आहे. संबंधित मुख्याध्यापकांना संबंधित शाळेतील विद्यार्थीनींच्या संख्येनुसार या निधीचे धनादेश देण्यात आले आहेत.आता मुख्याध्यापक हा निधी प्रत्येक विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे जमा करणार आहेत. अद्यापपर्यंत किती विद्यार्थिनींनी बँक खाते उघडले किती विद्यार्थिनींना निधी मिळाला याबाबत माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)प्रतीक्षा संपणार कधी?गेल्या दोन वर्षापासून जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर सायकल खरेदी करण्याच्या युक्तिवादानंतर अखेर मुलींना नगदी स्वरूपात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता तात्काळ धनादेश वितरित करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.