शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 8:01 PM

रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे.

ठळक मुद्देआणखी किती नागरिकांचे बळी हवेतरस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

औरंगाबाद :  बीड बायपास रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजता एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा बीड बायपासच्या रुंदीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

मागील तीन ते चार वर्षांमध्ये बीड बायपासवर वेगवेगळ्या अपघातांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या शंभरहून अधिक आहे. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिला अपघातात मरण पावली असेल त्यांच्यावर केवढा मोठा डोंगर कोसळला असेल याची जाणीवही महापालिकेतील कारभाºयांना नाही. निष्ठुर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी बीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्याची घोषणा मोठ्या जोमाने केली. मात्र, कृतीमध्ये महापालिका अपयशी ठरली.

बीड बायपासला लागून असलेल्या मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने महापालिकेला सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, असे आदेशित केले होते. यापूर्वीच मालमत्ताधारकांची सुनावणी घेण्यात आली. परंतु तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाल्याने नव्याने सुनावणी घेण्यात आली. ६ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, बीड बायपास रोडवर सतत अपघात होत असल्यामुळे संवेदनशील आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्वरित बायपासवर सायकलने धाव घेऊन पाहणी केली होती.

येथील अपघात सत्र थांबविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तर पाहणीसह बैठकीचे आयोजनही केले होते. या रस्त्यावर एकही अतिक्रमण दिसणार नाही, अशी घोषणा महापौरांनी केली होती. तत्कालीन पदनिर्देशित अधिकारी अभंग यांनी कारवाईसुद्धा केली होती. मात्र, बीड बायपासला साईड रोड करण्यासाठी प्रलंबित असलेली संचिका आजही प्रशासन प्रमुखांकडे पडून आहे.  

दोन वर्षांपूर्वीच मार्किंगमहापालिकेने बीड बायपास रोडवरील मालमत्तांवर दोन वर्षांपूर्वीच मार्किंगही केली आहे. शहर विकास आराखड्यातील नकाशानुसार महापालिकेने ही कारवाई केली. रुंदीकरण करायचेच नव्हते तर मार्किंगचे नाट्य तरी मनपाने कशासाठी केले, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

बायपासवर नागरिकांचा रास्ता रोकोसर्व्हिस रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बायपासवर आठवडाभराच्या अंतराने सलग तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून सार्वजनिक बांधकाम, जागतिक रस्ते विकास प्रकल्प अधिकारी, मनपा इत्यादी यंत्रणेसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढता येईल, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तात्काळ रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले.  यावेळी शिष्टमंडळात काँग्रेसचे शेख गुलाब, जुबेर मिर्झा, तरबेजभाई, हासन चाऊस, नवीद खान, शेख इरशू आदींसह नागरिकांचा सहभाग होता.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात