शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांची दैना,कोणी लक्ष देईना!

By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST

कुंभारपिंपळगाव : येथून जवळच असलेल्या राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायत,

कुंभारपिंपळगाव : येथून जवळच असलेल्या राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायत, पालकवर्ग आणि अधिकारी यापैकी कुणीच लक्ष देत नसल्याने अंगणवाड्यातील बच्चे कंपनी सैरभैर झाली आहे.
सदरील अंगणवाड्यांना खोल्या नाहीत. पोषण आहार निकृष्ठ दर्जाचा दिला जातो. त्यामुळे फूड पॉयझनच्या भीतीने पालकही लेकरांना अंगणवाड्यांत पाठवायचे टाळत आहेत. येथे ५ अंगणवाड्या आहेत. ४ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या या गावात अंगणवाड्यात जवळपास सरासरी ३०० बालकांची दप्तरी नोंद आहे. परंतु गैरसोयीमुळे प्रत्येक अंगणवाडीत दहा-पाच लेकर येतात. १ अंगणवाडी गावापासून ३ कि.मी. अंतरावर आहे. बालके गावात तर अंगणवाडी शेतात अशी अवस्था आहे. एका अंगणवाडीची खोली पडायला झाली आहे. त्यामुळे लहानगे मुल रस्त्यावरच गलिच्छ जागेत आहार घेतात. २ अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या शेजारीच भरतात.
यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी सुनंदा झरे आणि क्षेत्रीय अधिकारी सुनंदा जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्या एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. याबाबत त्यांना अधिक बोलते केले असता त्यांनी ग्रामपंचायत ठराव घेत नसल्याचे सांगितले. या अंगणवाड्यातील बालकांना शुध्द पाणी पुरवठा व्हावा, आजारी बालकांना औषधी व इतर साहित्य पुरविण्यासाठी खात्यावर २८ हजार रुपये ३ महिन्यांपासून येवून पडलेले आहेत. परंतु हा निधी का उचलला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामसेवक आणि प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मै-मै होत असल्याने अंगणवाड्यांची वाट लागत असून अंगणवाड्यातील मुले उघड्यावर आले आहेत.
शासनाच्या या योजनेची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी होत नसल्याने गावात नाराजीचे सूर उमटत आहेत. शासनाने ही योजना बालकांच्या हितासाठी सुरु केलेली असून बालकांचे पोषण आहारातून आरोग्य सुधारावे, हा उद्देश आहे. शासन अंगणवाड्यांसाठी ग्रामपातळीवरही लाखो रुपये खर्च करत असूनही योजना राबविण्याबाबत कुचराई होत असल्याने बालकांचे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातलीवरुन चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
राजाटाकळी येथील अंगणवाड्यांची दुरवस्था पाहता ग्रामपंचायतीने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे. अंगणवाड्यांसाठी आलेला २८ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित राहिल्यामुळे ग्रामपंचायतचे या दुरवस्थेकडे साफ दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. पोषण आहार, औषधी व खोल्यांच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.