शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

६९ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप

By admin | Updated: June 22, 2014 00:25 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने दरवर्षी पीककर्ज वाटप करण्यात येते. २०१४-१५ या वर्षासाठी खरीप हंगामाकरीता जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सप्टेंबरपर्यंत ५३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मे पासून आतापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या वतीने १६ हजार ४४४ हेक्टर जमिनीवरील १५ हजार १२६ शेतकऱ्यांच्या पिकांसाठी २२ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांचे तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या वतीने ३ हजार ३०५ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ३ हजार २४० शेतकऱ्यांना १९ कोटी २३ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. पीककर्ज वाटपाची ही सरासरी १२.९६ ही टक्केवारी असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत खरीप हंगामासाठीचे कर्ज वाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची काही दिवसापूर्वी बैठकही घेतली होती.
रब्बीसाठी १३३ कोटींचे उद्दिष्ट
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना एकूण १३३ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेला ३१ कोटी २० लाख रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेला ८९ कोटी ४० लाख रुपये आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १२ कोटी ४० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाचे कर्ज वाटप सुरू होते. (जिल्हा प्रतिनिधी)
काही बँकांकडून कर्ज वाटपास टाळाटाळ
जिल्ह्यातील काही बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत; परंतु शासनाने सर्व बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. एखादी बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास याबाबतची तक्रार संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते.