शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगींत ९० टक्के तंबाखूचे व्यसनी

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

लातूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगातील १० पैकी एकाचा मृत्यू होत आहे़ तसेच विविध कर्करोगी रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाचे आहेत़

लातूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगातील १० पैकी एकाचा मृत्यू होत आहे़ तसेच विविध कर्करोगी रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाचे आहेत़ विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत कर्करोगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ तंबाखू, गुटखा खाणे, सिगारेट, बिडी ओढणे अशा व्यसनामुळे निकोटीन नावाचा विषारी घटक शरीरात जातो़ तो मेंदूतील स्रायूंना आपल्या नियंत्रणात ठेऊन व्यसनाधिनता वाढवितो़ तंबाखूजन्य पदार्थ खाणार्‍या स्त्रियांमध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे़ तंबाखूचे सेवन टाळल्यास जगातील एक कोटी नवजात अर्भकांचे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात़ तंबाखू सेवनामुळे शरीरातील नियमित क्रिया बिघडते़ प्रतिकारशक्ती कमी होऊन जखमा दुरुस्त होण्याची प्रक्रिया मंदावते़ जुनाट दमा, रक्तदाब, फुफुसाचा कर्करोग, दमा, ब्रॉकॉयटीस, हार्टअ‍ॅटॅक, इम्फायसेमा, घशाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पॅनक्रियाटिक कॅन्सर होतो़ धुम्रपान सेवन करणार्‍या व्यक्तीचे आयुष्यमान जवळजवळ १० ते १५ वर्षांनी कमी होते़ धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जवळजवळ २० टक्के आढळून आले आहे़ भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांची संख्या जवळपास ५० टक्के असल्याचे आढळून आले आहे़ तंबाखूमुळे प्रामुख्याने तोंडाचा, अन्ननलिकेचा आणि श्वासनलिकेचा कर्करोग होतो़ शरीरातील प्रत्येक अवयवावर तंबाखूचा परिणाम होतो, असे छाती विकार व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ़ आऱ टी़ भराटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घालून विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने सन २०१२-१३ मध्ये ६ तर २०१३-१४ मध्ये १८ ठिकाणांवर धाडी टाकून कारवाई केली आहे़ कारवायांमुळे जिल्ह्यातील गुटखा विक्रीचे प्रमाण अल्प झाले आहे़ शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी दरवर्षी शिबिरे आयोजित करुन लाखो रुपये खर्च करण्यात येतात़ परंतु, या शिबिरांच्या माध्यमातून अपेक्षित असा परिणाम व्यसनांवर झालेला दिसून येत नाही़ व्यसनी लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे टक्केवारीवरुन पहावयास मिळत आहे़ शिवाय शासनाच्या वतीनेही दिनाचे औचित्य साधूनच जनजागृती केली़ त्यामुळे त्याचा परिणामकारक इफेक्ट होत नाही़