शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख ८२ हजार कुटुंब शेतीवरच

By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़ आजही जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना त्यातील फक्त १०६८ शेतकरी बहूभूधारक असल्याचे समोर आले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या वाढली़ त्यामुळे हिश्श्याला आलेल्या जमिनीच्या तुकड्यावर गुजरान करणे जिकिरीचे झाले़ त्याचा परिणाम म्हणून शेतीवर अवलंबून असलेली कुटुंब जमिनीचा तुकडा विकून व्यवसायासाठी शहराकडे धाव घेत आहेत़ तर काहींनी मध्यम मार्ग काढत शेतीला व्यवसायाची जोड दिली आहे़ शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसायाची गरज निसर्गाने कृपा केली तर पिकते, मात्र निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकर्‍यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे बँकेकडून घेतलेले कर्जही फेडणे कठीण जाते. परिणामी शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. यासाठी शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसाय तसेच शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन कसे काढता येईल, यावर भर देण्यासाठी योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होतील. १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी अत्यल्प भूधारक या वर्गवारीमध्ये येतात. तर १ ते ५ हेक्टर जमीन असलेले शेतकरी अल्पभूधारक तर ५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी बहूभूधारक शेतकरी गणले जातात. यामुळे गत काही वर्षात जिल्ह्यातील बहूभूधारक शेतकर्‍यांच्या संख्येत घट झाली. त्या तुलनेत जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली नसल्याने अत्यल्पभूधारकांचे प्रमाण वाढले आहे. अल्पभूधारक कुटुंबपद्धती अस्तित्वात लहान कुटुंबामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे २०१०- या वर्षात केलेल्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या संख्येमध्ये वाढ झाली,परंतु अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले. दहा वर्षांत ८२ हजार शेतकरीसंख्येत वाढ जिल्ह्यात गत दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००२-१ मध्ये अत्यल्प भूधारकांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ एवढी होती. तर लहान १ लाख ७६ हजार ५३९ तर मध्यम लहान १ लाख २७०४ तर मध्यम शेतकर्‍यांची संख्या २५३३४ तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ एवढी होती. सर्वसाधारणपणे अत्यल्प शेतकर्‍यांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ तर अल्प शेतकर्‍यांची संख्या २ लाख ७४ हजार ५७७ एवढी तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ अशी ५ लाख ३०६ एवढी होती. दहा वर्षापूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती, मात्र आता शिक्षण, नोकरी यामुळे कुटुंबांचे विभक्तीकरण होत आहे. याचा परिणाम संयुक्त कुटुंंबपद्धती बोटावर मोजण्याइतपत कुटुंबांमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५ लाख ८२ हजार २०० शेतकरी कुटुंंबाची संख्या आहे. यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांची संख्या २ लाख ४९ हजार ११२ एवढी आहे. तर लहान २ लाख ११२३२, मध्यम लहान १ लाख २१८ तर मध्यम २०५७० असे मिळून अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ३२ हजार २० एवढी आहे. तर बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या केवळ १०६८ आहे.