शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

४६२ घरकुले मान्यतेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 20, 2015 23:38 IST

चंद्रमुनी बलखंडे, परभणी ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी शासनाने सुरु केलेली राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक- २ चे ४६२ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये पडून आहेत.

चंद्रमुनी बलखंडे, परभणी
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी शासनाने सुरु केलेली राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक- २ चे ४६२ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये दोन वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना रमाई आवास योजना, इंदिरा गांधी घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर दारिद्र्य रेषेवरील परंतु, अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक- २ राबविण्याचा निर्णय घेतला. यानुसार प्रत्येक जिल्ह्याला घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. परभणी जिल्ह्यालाही २ हजार ८३ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. जिंतूर तालुक्यासाठी ३५७, परभणी ३८२, गंगाखेड २५९, सेलू २१३, पूर्णा २२२, पालम १९४, पाथरी १७९, मानवत १४७, सोनपेठ १३० घरकुलांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे यासाठीचे प्रस्ताव लाभार्थ्यांनी दाखल करावयाचे असतात. त्यानंतर हे प्रस्ताव मान्य करुन त्या त्या विभागातील बँकेकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. यातील मंजूर प्रस्तावांना ९० हजारापर्यंत कर्ज व १० हजार रुपये लाभार्थ्यांचे असे १ लाखाचे कर्ज संबंधित बँक देत असते. योजना चांगली असल्याने अनेक लाभार्थ्यांनी या योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले. त्यानुसार जिंतूर तालुक्यात २१७, परभणी १८६, गंगाखेड ४८, सेलू ६२, पूर्णा ८२, पालम ६७, पाथरी ५६, मानवत ३१, सोनपेठ २१ अशा ७७० लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावांना बँकेने मंजुरी दिली आहे. तरीही जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नव्हते. लाभार्थ्यांनीही प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ३६० प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. तर बँकेकडे ४६२ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यातील १० प्रस्ताव, परभणी तालुक्यातील १०५, गंगाखेड १३३, सेलू ६६, पूर्णा २७, पालम ७, पाथरी ४६, मानवत ४६, सोनपेठ २२ अशा ४६२ प्रस्तावांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रस्तावासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. सध्या मात्र हे प्रस्ताव मंजूर करावेत, यासाठी लाभार्थी ग्रामीण विकास यंत्रणा, संबंधित बँकेकडे चकरा मारत आहेत. परंतु, दोन वर्षापूर्वीचे प्रस्ताव असल्याने मूळ प्रस्तावांना मंजुरी देताना अडचणी येत आहेत. तसेच काही बँक अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याचीही ओरड होत आहे. त्यामुळे घरकुल मिळणारच नाहीत, अशी धारणा झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी आशा सोडून दिली आहे. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.