शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’ला ३५०० विद्यार्थ्यांची दांडी

By admin | Updated: September 29, 2014 00:48 IST

औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली.

औरंगाबाद : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रविवारी संशोधनपूर्व परीक्षा (पेट) कसलाही गोंधळ न होता सुरळीत पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शहरातील १७ केंद्रांवर ‘पेट’साठी परीक्षार्थींची आसन व्यवस्था केलेली होती. एकूण ५३ विषयांसाठी ९ हजार २३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी आज प्रत्यक्षात ५ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल ४० टक्के (३,४११) विद्यार्थी अनुपस्थित होते.सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान ‘पेट’चा पहिला पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य होता. दुपारी २.३० ते ४.३० वाजेदरम्यान संबंधित विषयांचे पेपर झाले. परीक्षेच्या सर्व केंद्रांवर कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, समन्वयक डॉ. माधव सोनटक्के, डॉ. सचिन देशमुख यांनी भेट दिली. परीक्षेसाठी विद्यापीठाने २० निरीक्षकांची नेमणूक केलेली होती. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेतल्यानंतर त्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली. विद्यापीठाने ‘ओएमआर’पद्धतीच्या उत्तरपत्रिका वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ कार्बन कॉपी देणे शक्य झाले.उद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर या परीक्षेची ‘अन्सर की’ टाकली जाईल. त्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना आपणास किती गुण मिळतील हे समजेल. येत्या ५ दिवसांच्या आत या परीक्षेचा निकाल जाहीर करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.