शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

३२ गावांचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: May 20, 2014 01:09 IST

सखाराम शिंदे, गेवराई गोदावरी नदीला महापूर आल्यास गोदकाठच्या अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो. यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

सखाराम शिंदे,  गेवराई गोदावरी नदीला महापूर आल्यास गोदकाठच्या अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो. यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे पुनर्वसन रखडले आहे. आता पावसाळा तोंडावर येताच पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनपासून तलवाड्यापर्यंतची अनेक गावे गोदावरीच्या काठी वसलेली आहेत. २००६ व २००७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैठण येथील नाथसागरही तुडुंब भरले होते. त्यावेळी गोदावरी नदीपत्रात पाणी सोडण्यात आले होते. धरणातून सोडलेले पाणी व पडत्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील रामपुरी, बोरगाव, भोगलगाव, कुरणींिपंप्री, पांचाळेश्वर, सावळेश्वर, राहेरी, राजापूर, राक्षसभुवन, आगरनांदुर अशा अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता. नदीला आलेला पूर व गावांना पडलेला पुराचा वेढा यामुळे अनेकांना गाव सोडून स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. तसेच शेतातील पिकेही वाहून गेली. यामुळे ग्रामस्थांवर आसमानी संकट ओढावले होते. यामुळे अनेक गावेच्या गावे स्थलांतरीत करण्यात आली होती. या नैसर्गिक आपत्तीकाळात आपद्ग्रस्तांना आमदार, मंत्री तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाने भेटी दिल्या होत्या. यावेळी आपद्ग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याच्या घोषणाही करण्यात आल्या होत्या. या पुनर्वसनाच्या घोषणेला आता आठ वर्षे लोटली तरीही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. गोदावरीला पूर आला की, या परिसरातील ग्रामस्थांच्या समस्यांमध्ये वाढ होते. पुनर्वसन होत नसल्याने ग्रामस्थांच्या जिवाला धोका कायमच आहे. मात्र याची ना महसूल प्रशासन दखल घेते ना लोकप्रतिनिधींना चिंता वाटते. पुनर्वसनासाठी २००९ मध्ये ३२ गावांचे पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. यावरही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने गोदाकाठच्या नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले, ३२ गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून पाठपुरावा सुरू आहे.