शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य आजारात २० गावे जोखमीची

By admin | Updated: March 13, 2016 14:24 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत. या गावांत वर्षभर विविध उपक्रम किंवा मनरेगात डासमुक्ती अभियान राबविण्यास गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात आले आहे. यात हिंगोलीमध्ये फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कनेरगाव नाका, आडगाव मुटकुळे तर भांडेगाव केंद्रांंतर्गत बासंबा, इंचा या गावांचा समावेश आहे. वसमतमध्ये गिरगाव केंद्रांतर्गत माळवटा, सोमठाणा, हट्टा केंद्रांतर्गत करंजाळा, चिखली तर कळमनुरीमध्ये डोंगरकडा केंद्रांतर्गत वारंगा, चिखली (जुनी), वाकोडी केंद्रांतर्गत वाई तर मसोड केंद्रांतर्गत सेलसुरा, रामेश्वर केंद्रांतर्गत दांडेगाव ही गावे जोखमीची आहेत. औंढ्यात पिंपळदरी केंद्रांतर्गत पिंपळदरी, काकडदाभा, शिरडशहापूर केंद्रांतर्गत माथा, जवळा बाजार केंद्रांतर्गत वडद तर सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह या केंद्रांतर्गत माझोड, कवठा आरोग्य केंद्रांतर्गत वटकळी या गावांची निवड केली आहे. जिल्हाभरात एकूण ७११ गावे असून २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २०१५ मध्ये हिवतापासाठी ७० हजार ७७६ प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष ६३ हजार ४८६ असे एकूण १ लाख ३४ हजार २६२ रक्तनमुने तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यापैकी ३ नमुने हिवताप दूषित आढळले. मात्र वर्षभरात हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराच्या उद्रेकाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे हिवताप कार्यालयाचे म्हणणे आहे. जोखमीच्या गावांत तापाचे रुग्ण आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेटी देवून जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, नियमित कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण करायचे आहे. इडीस डासआळी आढळल्यास १०० टक्के घरांना भेटी देवून टेमिफॉस फवारणी करीत आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत झाली. डासोत्पत्ती वाढल्यास पाण्यात जळालेले आॅईल, रॉकेल, वंगण अथवा गप्पी मासे सोडावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.निवडलेल्या गावात मनरेगात शोष खड्डे घेवून डासांची उत्पत्ती थांबवून त्या गावात पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. रस्त्यावर खड्ड्यांत साचणारे पाणीही साठणार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ही कामे करण्यास सांगितले. तर एक दिवस तरी कोरडा पाळणे गरजेचे आहे.