शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध मातासाठी प्रशासन ‘श्रावणबाळ’ ठरेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:36 IST

बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या.

कुणीही लक्ष देईना ! : मानधनासाठी वृद्ध मातांची तहसीलमध्ये पायपीट.राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या. त्यांच्या मायेतही एक प्रकारची अगतिकता दिसत होती. शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासाठी त्यांची ही केविलवानी धडपड सुरू होती.हा प्रसंग क्रांतीभूमीतील गजबजलेल्या नेहरू चौकातील जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात बघायला मिळाला आणि निराधार वृध्द महिलांना खरेच शासनाचा आधार मिळाला का, असा प्रश्न निर्माण झाला. तालुक्याच्या टोकावर असलेल्या बामनगाव येथील वृद्ध मातांचे वृद्धापकाळ निवृत्ती मानधन काही महिन्यापासुन रखडले आहे. या वृद्ध मातांनी अनेकदा तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. शासकीय कार्यालयच ते, दप्तर दिरंगाई ठासून भरलेली. या वृद्ध मातांना त्याचीच प्रचिती आली. त्यामुळे आपले मानधन किंवा रोजची होत असलेली कुचंबना याची कैफीयत मांगण्यासाठी या वृद्धमाता गजानन बुटके यांच्याकडे पोहचल्या. बुटके यांनी महिलांची अवस्था व शासकीय लेटलतीफशाहीमुळे या वृद्ध मातांना होणाऱ्या त्रासाची कैफीयत या मातासह तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विनायक मंगर यांच्यापुढे मांडली. या २९ महिलांपैकी काही महिलांना मागील चार-पाच महिन्यांपासून श्रावणबाळ, निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही तर काही मातांनी निराधार योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र त्यांना अजूनही शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या महिलांना जीवनाच्या सायंकाळी मोठा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेक मातांना त्यांच्या आप्तेष्टांनी दूर केल्याने त्यांना जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शासनाचे श्रावण बाळ योजना, निराधार योजना. या योजनाचे मानधन वेळेवर जमा न झाल्यास या असंख्य महिलांना जगण्यासाठी कसरत करावी लागते. त्यांच्या थकत्या काळात कुणीच मदत करीत नाही तर शासनाच्या या योजनाच त्यांना जीवन जगण्याचे साधन ठरले आहे. मात्र बाबुगिरीमुळे अनेक वृद्ध मातांचे मानधन थकल्याने या मातांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कावड घेऊन त्यात वृद्ध मातापित्यांना ठेवत त्यांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाचा आदर्श समाजापुढे आहे. तरी अनेक वृद्ध माता-पिता उपेक्षित जिणे जगत आहेत. किमान शासन तरी त्यांच्यासाठी श्रावणबाळ ठरावे, अशी अपेक्षा आहे.