शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष तीव्र होण्यापूर्वी वाघांचे स्थानांतरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असून सदर मागणी वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला इको-प्रोचे निवेदन : इरईलगचे झुडपे नष्ट करण्याची मनपाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघांची मोठे झालेले बछडे सीएसटीपीएसच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर तर आता पुढे इरई नदीच्या पात्रातून प्रवास करीत वडगाव, हवेली गार्डन, दाताळा, कोसाराच्या शिवारात तसेच मानवी वस्तीत येत आहेत. शहरालगत किंवा शहरी भागात असलेला वाघांचा वावर मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी, मानद वन्यजीव रक्षक, इको-प्रोचे बंडु धोतरे यांनी केली आहे.वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असून सदर मागणी वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.मागील काही वर्षांपासून सीएसटीपीएस परिसरात बाभुळचे कृत्रीम जंगलामुळे तसेच परिसरात उपलब्ध पाणी व मोकाट जनावरांमुळे वाघांकरिता उत्तम अधिवास निर्माण झालेला असून सदर परिसर वाघिणीने पिल्लांना जन्म देणे व संगोपन करण्याच्या दृष्टीने स्वीकारलेला आहे. नैसर्गिक जंगल नसलेल्या औद्योगिक परिसरातील वाघांनी सदर अधिवास स्विकारणे आणी तिथेच वावरणे ही बाब भविष्यात धोकादायक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.काही दिवसांपासून इरई नदीकाठच्या वस्तीत वाघाचे अस्तित्व दिसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाच्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षितेकरिता इरई नदीच्या दिशेने भागातील काटेरी बाभळीचे झुडुपसदृश जंगलाची सफाई करणे, प्रखर प्रकाशव्यवस्थेसोबत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.इरई नदीलगतच्या परिसरात वाघाचा वावर काटेरी झुडपामुळेचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात तसेच लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी बाभुळचे जंगल तयार झाले आहे. दाटी-वाटीने वाढणारी ही वनस्पती असल्यामुळे निर्माण होणारी जंगलसदृश अधिवास हा वन्यप्राण्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. या संपूर्ण परिसरात मोकाट जनावरांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात असून, येथे सतत वाहणारे नाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना योग्य लपण, खाद्य आणी पाणी यामुळे वन्यप्राणी अधिवास निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती इरई नदीपात्रालगत असल्याने वाघाचा वावर नदीपात्रातही आहे. यात वडगाव, हवेली गार्डन, जगन्नाथ बाबा मठ तर दुसºया बाजुस दाताळा, कोसाराकडील शेतशिवाराचा भाग आहे. त्यामुळे काटेरी झुडपे तोडण्याची मागणी इको-प्रो ने केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ