शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा - महाराष्ट्र सीमावाद पुन्हा ऐरणीवर; "आम्ही महाराष्ट्रातच राहणार" चंद्रपुरातील गावांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:36 IST

Chandrapur : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जिवती तालुक्यातील १५ वादग्रस्त सीमावर्ती गावांत दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती (चंद्रपूर):
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जिवती तालुक्यातील १५ वादग्रस्त सीमावर्ती गावांत दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागात तणाव आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच व्यक्तीची नोंद दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाच्या जनगणना मोहिमेला जिवती तालुक्यात सुरुवात झाली असून, तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी नागरिकांना यापूर्वी ऑनलाइन 'स्वगणना' करण्याचे आवाहन केले होते. १६ मे ते १४ जूनदरम्यान घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी तेलंगणा प्रशासनानेही सीमावर्ती गावांत जनगणना सुरू केल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. कुमुरमभीम आसिफाबाद जिल्हांतर्गत केरामेरी मंडळातील मुकदमगुडा येथे तेलंगणा प्रशासनाच्या घर नकाशांकन सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. "आम्ही महाराष्ट्रातच राहणार," अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. गावातील सर्व नागरिक मराठी भाषिक असून, मुलांचे शिक्षण महाराष्ट्रातच होत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. तसेच शेतजमिनींचे पट्टे मिळाले नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला. तणाव वाढताच पर्यवेक्षक पदकम टी. अजय कुमार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून विविध शासकीय सुविधा सुरू राहतील, असे आश्वासन दिल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले.

या गावात तेलंगणा सरकारकडून जनगणना प्रक्रिया सुरू

परमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लॅडिगुडा, पळसगुडा ही आठ महसुली गावे तसेच परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार, कोठा (खुर्द) हे सात गुडे-पाडे अशा एकूण १५ सीमावर्ती गावांत सथ्या तेलंगणा सरकारकडून जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, केरामेरी मंडळचे तहसीलदार घोडाम संतोष कुमार यांनीही पथकासह गावाला भेट देत नागरिकांना तेलंगणा सरकारच्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी पुन्हा आपली महाराष्ट्रात राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही समांतर जनगणना

  • यापूर्वी २०१०-११ च्या जनगणनेवेळीही दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना करण्यात आली होती. आता पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने सीमाभागातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • सीमावादाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
  • तेलंगणा सरकारकडून सुरू असलेली जनगणना तत्काळ थांबवून महाराष्ट्र सरकारकडूनच या गावांत जनगणना करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते रामदास रणवीर, लिंबादास पतंगे, छगन साळवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra-Telangana Border Dispute Rekindled: Villages Demand to Stay in Maharashtra

Web Summary : Maharashtra-Telangana border dispute escalates as both states conduct census simultaneously in disputed villages. Villagers in Chandrapur district protest Telangana's survey, firmly stating their desire to remain in Maharashtra, citing Marathi language and education.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा