शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे.

ठळक मुद्देतीन गावातील शेतकऱ्यांना अडचण : बांधकामही निकृष्ट दर्जाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पारधीगुडा-मंगी रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार थातूरमातूर बांधकाम करीत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय या रस्त्यामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार व गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे. या मार्गावरील नाल्यात थातूरमातूर सिमेंट पाईप टाकून काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूला मोठी नाली काढल्याने या परिसरात शेती करणाºया पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील शेतकºयांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता बांधकाम करताना रस्ता खचून जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. कंत्रादारांकडून नाली बांधकाम करून त्यावर छोटा सिमेंट काँक्रीट रपटा बांधणे गरजेचे होते. परंतू चांगल्या कामांना बगल देत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी विविध अवजारे घेऊन शेतात जात असतात. मात्र या रस्त्या बंद झाल्याने शेतकºयांना मोठी अडचण जात आहे. खरीप हंगामपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला परिसरातील शेतकऱ्याच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्याची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या बांधकामाची सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी चौकशी करावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव ग्रामपंचायत.

टॅग्स :agricultureशेती