शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मूल नगर परिषदेतील मालमत्ता विभागात सावळा गोंधळ

By admin | Updated: November 1, 2015 01:09 IST

स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून ...

विभाग प्रमुखाचा दुर्लक्षितपणा : फेरफार नोंदीची प्रकरणे धूळ खातमूल : स्थानिक नगर परिषदेमधील मालमत्ता विभागात कार्यरत विभाग प्रमुख बोस यांच्या दुर्लक्षितपणामुळे सावळा गोंधळ सुरू असून गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत तासन्तास वाट बघावी लागते. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून फेरफार नोंदीचे प्रकरण धूळखात असून नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही फेरफार केला जात नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.नगर परिषदेत उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता विभाग आहे. मात्र मालमत्ता विभागात कार्यरत असलेले विभाग प्रमुख बोस हे चंद्रपूरवरुन ये-जा करीत असल्याने वेळेवर कार्यालयात केव्हाच उपलब्ध राहात नाहीत. संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणे, त्यातील नियोजन करणे, ही विभाग प्रमुखांची जबाबदारी असताना मात्र त्याकडे त्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गृहकर भरण्यास आलेल्या नागरिकांना ताटकळत वाट बघावी लागत असेल तर नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता विभाग संवेदनशिल नसल्याचे यावरुन दिसून येते. मालमत्ता विभागातील कर्मचारी जनगणनेच्या कामात असले तरी कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना गृहकराची पावती कापण्यासाठी एका कर्मचाऱ्याला तरी कार्यालयात बसवून जबाबदारी देणे गरजेचे होते. मात्र विभाग प्रमुखाच्या दुर्लक्षितपणामुळे मालमत्ता विभागातील प्रशासन ढासळल्याची बाब समोर आली आहे.नगर परिषदेच्या क्षेत्रात प्लॉटची विक्री केल्यानंतर रितसर नोंदीसाठी नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर केल्या जातो. त्याची वर्तमान पत्रात रितसर जाहीरात दिली जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच त्याची फेरफार नोंद करणे आवश्यक असताना नागरिकांना हेलपाट्या माराव्या लागत आहे. तब्बल सहा महिन्यानंतरही फेरफार नोंद करण्यात आली नसल्याने नागरिकांचा नगर परिषदेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. कुणाला बांधकामासाठी परवानगी घ्यायची असल्याने फेरफार नोंदीची आवश्यकता असते. मात्र यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. ‘चिरीमिरी’ घेण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नोंदी नसल्याने बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करता येत नाही. ज्यांना कुणाला बांधकाम करायचे आहे, त्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली तर अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात येते. एकीकडे फेरफार नोंद घ्यायची नाही दुसरीकडे बांधकाम सुरू केल्यास नोटीस द्यायची ही बाब न संताप आणणारी आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांची होत आहे गोची मूल नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने नागरिकांची चांगलीच गोची होत आहे. विभाग प्रमुख आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याने त्याच्या अख्त्यारित काम करणारे कर्मचारी अनियंत्रित झाले आहेत. अच्छे दिन आणून म्हणणाऱ्या भाजपाचीच या नगरपालिकेवर सत्ता आहे. मात्र सत्ताधारीही याकडे कानाडोळा करताना दिसतात. भाजपाप्रणित नगर परिषद प्रशासनातील पारदर्शकता आणण्यास सत्तारुढ पदाधिकारी व नगरसेवक प्रयत्न करणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.