शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार सुशिक्षितांना नोकरी

By admin | Updated: November 25, 2014 22:52 IST

उच्च शिक्षण घेऊन दरवर्षी शेकडो सुशिक्षीत युवकांचे जत्थे बाहेर पडत आहेत. मात्र, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. रोजगारासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु आहे.

नोंदणी पटात घट : रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीचा फायदा
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
उच्च शिक्षण घेऊन दरवर्षी शेकडो सुशिक्षीत युवकांचे जत्थे बाहेर पडत आहेत. मात्र, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. रोजगारासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु आहे. मात्र, रोजगार व स्वंयरोजगार केंद्राने गत पाच वर्षात ६ हजार ९३६ सुशिक्षीतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरी मिळवून दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात सुशिक्षीतांची नोंदणी होत असते. यात दरवर्षी नोंदणी व नुतणीकरण होत असल्याने सुशिक्षीतांची शैक्षणिक पात्रता रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात उपलब्ध असते. २००८ पासून आॅक्टोंबर २०१४ पर्यंत चंद्रपूरच्या जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात ५ लाख ४७ हजार ३४८ सुशिक्षीत बेरोजगारांनी नोंदणी केली. यापैकी ८३ हजार ४४० उमेदवारांचे नोकरी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. यात ६ हजार ९३६ उमेदवारांना विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय व खाजगी कार्यालय, कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
रोजगार व स्वंयरोजगार केंद्रामार्फत सुशिक्षीतांची नोेंदणी करुन त्यांची शैक्षणिक पात्रता अपडेट ठेवली जात असल्याने एखाद्या शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकर भरती निघाल्यास घरपोच पत्र पाठवून नोकरीसाठी बोलाविले जाते. याचा लाभ शेकडो उमेदवारांना झाला आहे. असे असले तरी अनेक जण एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा नुतणीकरणासाठी येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात उपलब्ध आकडेवारीत अनेक जण बेरोजगारच असल्याचे दिसून येते. सध्या सुशिक्षीत बेरोजगारांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती झाली आहे. त्यामुळे अनेकजण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातूनही नोकरी मिळत आहे.