शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:55 AM

भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने द्यावा ५ कोटींचा निधी, नगर परिषदेकडून पाठपुरावा सुरू

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील ऐतिहासिक गवराळा पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो.भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निसर्गाचे वरदान, रमणीय परिसर, आजुबाजुला टेकड्या, सभोवताली आमराई, बाजुलाच १० एकर परिसर असलेला गवराळा तलाव असे सौंदर्य या मंदिराला लाभले आहे. नगरपरिषदद्वारे हा खासगी तलाव विकत घेवून सौंदर्यीकरणाच प्रयत्न सुरू आहे.सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर तलाव न.प. ने विकत घेतल्यास तसेच यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास चांगले पर्यटन स्थळ अस्तित्वात येवू शकते. तलावात बोटींग, तलाव खोलीकरण, सभोवताल दिवे, तलावाभोवती फिरण्यासाठी मार्ग तयार करण्याचा न. प. चा मानस आहे. यातून परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. एका उत्तरभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे.भद्रावती शहरात पर्यटनाची मांदियाळीभद्रावती परिसरात बरीच पर्यटनस्थळे आहेत. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग तालुक्यात येतो. भद्रावती ते ताडोबा सरळ मार्ग झाल्यास भद्रावती येथे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. जगप्रसिद्ध विजासण लेणी, जैन मंदिर, गोंडराजाचा किल्ला, नाग मंदिर, भवानीमाता मंदिर, पुरातन डोलारा तलाव पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. चांदा ते बांदा योजनेतंर्गत सुधारणा केल्यास तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.गृत्स्यमदाची तपश्चर्याएका उत्तरभिमुख असलेल्या गवराळा येथील मंदिरात सहा फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक. गृत्स्यमदाने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या केली. तेथे वर प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर वरदविनायकाची स्थापना झाली. समोर उत्तरमुखी हनुमान मंदिर व बाजुलाच मोठे स्वयंपाकगृह आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

टॅग्स :tourismपर्यटन