शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:55 IST

भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने द्यावा ५ कोटींचा निधी, नगर परिषदेकडून पाठपुरावा सुरू

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील ऐतिहासिक गवराळा पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो.भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निसर्गाचे वरदान, रमणीय परिसर, आजुबाजुला टेकड्या, सभोवताली आमराई, बाजुलाच १० एकर परिसर असलेला गवराळा तलाव असे सौंदर्य या मंदिराला लाभले आहे. नगरपरिषदद्वारे हा खासगी तलाव विकत घेवून सौंदर्यीकरणाच प्रयत्न सुरू आहे.सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर तलाव न.प. ने विकत घेतल्यास तसेच यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास चांगले पर्यटन स्थळ अस्तित्वात येवू शकते. तलावात बोटींग, तलाव खोलीकरण, सभोवताल दिवे, तलावाभोवती फिरण्यासाठी मार्ग तयार करण्याचा न. प. चा मानस आहे. यातून परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. एका उत्तरभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे.भद्रावती शहरात पर्यटनाची मांदियाळीभद्रावती परिसरात बरीच पर्यटनस्थळे आहेत. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग तालुक्यात येतो. भद्रावती ते ताडोबा सरळ मार्ग झाल्यास भद्रावती येथे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. जगप्रसिद्ध विजासण लेणी, जैन मंदिर, गोंडराजाचा किल्ला, नाग मंदिर, भवानीमाता मंदिर, पुरातन डोलारा तलाव पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. चांदा ते बांदा योजनेतंर्गत सुधारणा केल्यास तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.गृत्स्यमदाची तपश्चर्याएका उत्तरभिमुख असलेल्या गवराळा येथील मंदिरात सहा फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक. गृत्स्यमदाने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या केली. तेथे वर प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर वरदविनायकाची स्थापना झाली. समोर उत्तरमुखी हनुमान मंदिर व बाजुलाच मोठे स्वयंपाकगृह आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

टॅग्स :tourismपर्यटन