शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रेल्वे मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 6:00 AM

रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूरची ओळख मिनी भारत अशी आहे. २२ राज्यातले लोक या शहरात वास्तव्यास आहे. सर्व दिशांना येथून रेल्वे जातात. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशन तसेच चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन अत्याधुनिक व सुंदर व्हावे, यासाठी मी वनमंत्री असताना वनविभागाच्या माध्यमातून निधी देवून ही रेल्वे स्थानके सर्वोत्तम व देखणी व्हावी, यासाठी प्रयत्न केला. रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकावर दोन फुड स्टॉल्सचे उदघाटन रविवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी स्टेशन प्रबंधक रामलाल, भाजपा नेते अजय दुबे, के.के. सेन, श्रीनिवास घोटकर, स्टॉल ओनर प्रकाश भानारकर, प्रविण कलसाईट, सुर्यनारायण राव, सुभाष पेकडे, रामलाल सिंह, भारती सोमकुंवर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रेल्वेशी संबंधित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेन. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना याठिकाणी आमंत्रित करून येथील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारrailwayरेल्वे