शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीला राजकारण अडसर

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार

हरदोना : १५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा सरस आहे. हे गावातील नागरिकांना पटवून देत आहे. उमेदवारही मतदार राजापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहे. मात्र गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरत आहे.विधानसभा निवडणूकांचा सावत्रिक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी गणित जुळवित आहे.निवडणूक आठवड्याभरावर आली आहे. उमेदवारांना मतदार राजापर्यंत पोहचायला मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून मतदारांना विविध आमिष दाखवून आपलेसे करण्यात राजकीय कार्यकर्ते गुंतले आहे. पाच वर्षात कधी गावात न पोहचलेले उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ते सकाळपासूनच गावात फिरत आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक काळात तंटामुक्त गाव समित्यांना सक्रिय राहणे गरजेचे आहे. निवडणुकी दरम्यान गावातील शांततेचा सारीपाट बदलत असतो. गावागावात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक जण पूर्णवेळ प्रचारात गुंतले आहे. असले तरी मतदार राजानी आता सावध राहणे तेवढेच गरजेचे आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदारांना आपले करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. अनेकांनी आमिषेही दाखविले आहे. मतदारांना भूल पाडण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात कार्यकर्ते मग्न आहे. त्यामुळे काही राजकीय कार्यकर्त्यांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समितीला कोणतेही राजकीय वलय न लागता कोणताही निर्णय घेतात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी निवडणूक काळात सक्रिय राहण्याची गरज सध्या आहे. निवडणूकीदरम्यान गावातील राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरु शकते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आता खऱ्या अर्थाने तंटामुक्त समित्यांकडे आले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावात काम करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)