शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी एक लाख १२ हजार मेट्रिक टन खत

By admin | Updated: June 17, 2017 00:31 IST

सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे.

युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी : यावर्षी खताची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी खरीप हंगामात खताची टंचाई भासू नये यासाठी शासनाकडे १ लाख ३४ हजार ८७३ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रिक टन खताचे आवंटन शासनाने मंजूर केले आहे. त्यामुळे यावर्षी कुठेही खताची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे.दरवर्षी खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होत असते. अनेक विक्रेते खताचा साठा करून ठेवत कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर जादा दराने खताची विक्री करीत असतात. यातून शेतकऱ्यांची मोठी फसगत होत असते. हा प्रकार दरवर्षीच घडत होता. त्यामुळे राज्य शासनाने यावर्षी खतविक्रीचे नवीन निकष तयार केले आहे. या निकषाच्या आधारे यावर्षी खत विक्री होणार असून यात दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय खताची मागणी लक्षात घेवून राज्य शासनाकडे खताची मागणी केली होती. मात्र मागणी केलेल्या खतापैकी १ लाख २२ हजार ६०० मेट्रीक टन खत जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. या खताचे तालुकानिहाय आवंटन जिल्हा प्रशासनाने मंजूर केले असून सर्वाधिक खत राजुरा, कोरपना, चिमूर, वरोरा व ब्रह्मपुरी तालुक्यांना वाटप केले जाणार आहे. या खतामध्ये युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी आहे. शासनाने या खताची किंमत ठरवून दिली असून जादा दर आकारल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्या विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.पाच तालुक्यांना सर्वाधिक खतांची गरजचंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, तूर या सोबत सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिंदेवाही, ब्रह्मपुरी परिसरात धान तर चिमूर, राजुरा, वरोरा, कोरपना तालुक्यात कापसाचे उत्पादन होते. या पाचही तालुक्यांसाठी सर्वाधिक खताची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने ब्रह्मपुरी तालुक्याला १० हजार २० मेट्रीक टन, चिमूर तालुक्याला १४ हजार २१५ मेट्रीक टन, कोरपना तालुक्याला १४ हजार ४७६ मेट्रीक टन, राजुरा तालुक्याला १० हजार ६४१ मेट्रीक टन तर वरोरा तालुक्याला १४ हजार १३७ मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर केले आहे.५ हजार १२६ क्विंटल बियाणांची विक्रीखरिपासाठी यावर्षी भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस आदी बियाणांची ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणांची मागणी होती. शासनाकडून ३१ हजार ५५९ क्विंटल बियाणे प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहेत. यापैकी ५ हजार १२६ क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झाली आहे. यात १ हजार २७३ सार्वजनिक तर ३ हजार ८५३ खाजगी स्वरूपात बियाणे विक्री झाले आहे.युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणीकापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी युरिया व डीएपी खताची सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार प्रशासनाने शासनाकडे दोन्ही खताची मागणी केली होती. शासनाने युरिया खताचे ५३ हजार ३०० मेट्रिक टन तर डीएपी १३ हजार मेट्रिक खताचे वाटप मंजूर केले आहे.