शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात करोडो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

बल्लारपूर : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)च्या वतीने सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. मागील तीन वर्षांपासून ...

बल्लारपूर : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)च्या वतीने सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. मागील तीन वर्षांपासून ७० करोडपेक्षा जास्त खर्च या योजनांवर करण्यात येत आहे. यानंतरही बल्लारपूरच्या जनतेस २४ तास पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती सांगता येत नाही. कारण शहरात जिकडेतिकडे जलवाहिन्यांची गळती असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारा सुरू करण्यात आलेली नवीन १३ लाख लिटर क्षमतेची टाकी दीड तासातच खाली होत आहे.

त्या टाकीचे पाणी एवढ्या लवकर कुठे जाते, याचा शोध महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा घेत आहे. यामुळे रोज करोडो लिटर पाणी वाया जात आहे. अजूनही जुनी पाईपलाईन बंद करायला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना यश आलेले नाही. यामुळे जुन्या पाईपलाईनमधून पाणी वाया जाते. शहरात मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे नळ ग्राहकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांवर असंतोष व्यक्त केला आहे. शुक्रवारी सेवासिंग पेट्रोलपंपासमोर पत्ता गोडाऊनजवळ ‘मजीप्रा’ची पाणी पाईप फुटून पाणी धो धो वाहत होते. मंजितसिंग कालरा यांनी सांगितले की मेनेवारच्या घराजवळ मागील एक महिन्यापासून फुटल्या पाईपमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु मजीप्राचे कर्मचारी चौकशी करायला तयार नाहीत. हे कर्मचारी पाण्याची कुठून गळती आहे, हेसुद्धा अधिकाऱ्याला सांगत नाहीत. याशिवाय पाणी समस्या घेऊन आम आदमी पार्टीचे रविकुमार पुप्पलवार यांनी मजीप्राला निवेदन दिले; तरी शहरात पाणीगळतीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु दीड महिन्यापासून नव्या टाकीचे १३ लाख लिटर पाणी कुठे मुरत आहे, याचा थांगपत्ता अधिकाऱ्यांना लागत नाही.

कोट

सध्या कोविड साथीमुळे काही लोक बाधित आहेत व कामगारांच्या कमतरतेमुळे समस्या सुटण्यास वेळ लागत आहे. यामध्ये जनतेचे सहकार्य आवश्यक आहे; परंतु लिकेजच्या तक्रारी कोणीच करीत नाही.

- एस. बी. येरणे, अभियंता, मजीप्रा, बल्लारपूर