शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राव्दारे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने ईएमआय भरण्यासाठी तिन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ज्यांनी वाहन, घर व इतर बाबींसाठी कर्ज घेतले त्यांना याचा लाभ होईल. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक हप्ता भरण्यासाठी ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.निराधाराचे अनुदान व जनधन खात्यात जमा होणाºया अनुदानाची रक्कम काढताना संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या रांगा न लावता. सानिटायझरचा वापर करून सहजपणे पैसे काढता यावे. यासाठी नियोजन करावे. ३१ मार्चपर्यंत परवान्यांचे नुतनीकरण केल्या जाते. संचारबंदीमुळे सर्व कार्यालय बंद आहे. ३१ मार्चपर्यंत नुतनीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे ही मुदत ३० जुनपर्यंत वाढवावी. वाहनांचा विमा भरण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत संपत आहे. त्यामुळे विमा भरण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्याचे पत्रात म्हटले आहे.वनालगतच्या गावांमधील गवताची कापणी करून चारा उपलब्ध कराकोरोना व्हायरसमुळे राज्यातील संपूर्ण कामकाज बंद पडले. ग्रामीण व आदिवासी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. शेतकºयांच्या हितासाठी राज्य शासनाने तातडीने धोरण तयार करावे. वनालगतच्या गावामध्ये जंगलातील गवताची कापणी करून पाळीव जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जनावरांना पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध होईल व ही श्रुखंला तुटणार नाही. या दृष्टीने संबंधितांना तात्काळ निर्देश द्यावेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेशी निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्नही प्राधान्यांने निकाली काढावे, असेही मुख्यसचिवांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार