शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

खेमजईत सामाजिक जाणिवा, हास्य व प्रेम कवितांनी रंगले कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे जिल्ह्यातील निमंत्रितांचे कविसंमेलन बहारदार कवितांनी रंंगले. जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीने गावकरीही भारावले. सामाजिक जाणिवा, प्रेम, ...

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे जिल्ह्यातील निमंत्रितांचे कविसंमेलन बहारदार कवितांनी रंंगले. जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीने गावकरीही भारावले. सामाजिक जाणिवा, प्रेम, हास्य कवितेच्या माध्यमातून ग्रामप्रबोधनही घडून आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद गंपावार, अध्यक्षस्थानी माजी सरपंच नारायण कापटे, विलास चौधरी उपस्थित होते. पं. स.पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी व खेमजई गावचे सुपुत्र कवी धनंजय साळवे व कुटुंबीयांच्या पुढाकाराने गावात कविसंमेलन पार पडले. निमित्त होते सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकर साळवे यांच्या षष्ट्यब्दिपूर्ती सोहळ्याचे.

कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या संचालनात जिल्ह्यातील प्रथितयश कवी अविनाश पोईनकर, ईश्वर टापरे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, मिलेश साकुरकर, नरेंद्र कन्नाके, पंडित लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, जयवंत वानखेडे, चंदू झुरमुरे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, अरुण घोरपडे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेमजई येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आदर्श ग्राम घडवण्याचा कृतियुक्त संकल्प करावा, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मत धनंजय साळवे व मान्यवरांनी व्यक्त केले. आभार शीतल साळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या संचालनात जिल्ह्यातील प्रथितयश कवी अविनाश पोईनकर, ईश्वर टापरे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, मिलेश साकुरकर, नरेंद्र कन्नाके, पंडित लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, जयवंत वानखेडे, चंदू झुरमुरे, सुनिल बावणे, संतोषकुमार उईके, अरुण घोरपडे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेमजई येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आदर्श ग्राम घडवण्याचा कृतियुक्त संकल्प करावा, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मत धनंजय साळवे व मान्यवरांनी व्यक्त केले. आभार शितल साळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.