शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख ७६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

By admin | Updated: June 15, 2017 00:28 IST

गतवर्षीचा ओला दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.

कृषी विभागाचे नियोजन : भात आणि सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्रलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षीचा ओला दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने यावर्षी चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले असून बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून आता फक्त पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हाचा पार अद्यापही कमी झालेला नसला तरी शेतकरी कामात व्यस्त असून पाऊस पडल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, तूर, कापूस, आदी पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर होणाऱ्या पेरणीद्वारे ९०० लाख ५ हजार क्विंटल उत्पन्न होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी खचलेला नसून नव्या जोमाने खरीपाच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ व २०१५ असे सातत्याने तीन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. त्यानंतर २०१५ मध्येही समाधानकारक पाऊस न झाल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली. २०१६ ला अतिवृष्टीने काहींची पिके नष्ट झाली. त्यानंतर रबी हंगामातही अनेकदा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले होते. मात्र यावर्षी चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा आहे. भाताचे सर्वाधिक क्षेत्र यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३६ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तर सोयाबीन १ लाख ६९ हजार हेक्टर, कापूस ५८ हजार ८०० हेक्टर, तूर ३१ हजार हेक्टर, ज्वारी ३ हजार ९०० हेक्टर तर ३ हजार २०० हेक्टरवर इतर पिकांची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. यावर्षी तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल का, अशी चर्चा आहे.७५ हजार ९९९ क्विंटल बियाण्यांची गरजयावर्षी शेतकरी कापूस, तूर, भात व सोयाबिन या बियाण्यांची जास्त मागणी करणार असल्याने कृषी विभागाने याआधीच बियाणांचा साठा करून ठेवला आहे. सार्वजनिक स्वरूपात २५ हजार २६३ क्विंटल तर खासगी स्वरूपात ५० हजार ७३६ क्विंटल बियाण्यांची मागणी असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यापैकी सार्वजनिक मागणीचे ७ हजार २०६ व खासगी मागणीचे २४ हजार ३५२ क्विंटल बियाणे कृषी विभागाकडे उपलब्ध झाले आहे. यापैकी सार्वजनिक व खासगीचे ५ हजार १२६ क्विंटल बियाणांची विक्री आतापर्यंत झाली आहे. बियाण्यांचा ऐन हंगामात काळाबाजार होणार नाही, याकरिता कृषी विभागाने उपाय योजनाही आखल्या असून भरारी पथकाची नेमणूक केली आहे. कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासादोन दिवसांपुर्वीच राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलास देत कर्जमाफी केली. यामुळे जिल्ह्यातील १ लाख १७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांवर लाखोंचे कर्ज थकीत होते. मात्र आता कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांवरील दडपण दूर झाले असून नव्या दमाने शेती करण्यास शेतकरी सज्ज झाला आहे.