शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मानधन योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 AM

बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देगोविंदा पोडे : नांदगाव (पोडे) येथे नोंदणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतातील ७० टक्के ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी व्यवसायांवर अवलंबून आहे. लाखोंच्या पोशिंद्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी मानधन योजना सुरु केली. केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भवितव्याची चिंता आहे. यातूनच शेतकरी मानधन योजना कार्यान्वित करण्यात आली असून योजना शेतकºयांना फायदेशिर असल्याचे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी बुधवारी नांदगाव (पोडे) येथे केले.बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद देठे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जयंत पोहनकर, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, कृषी मंडळ अधिकारी बी. एस. सलामे, कृषी विस्तार अधिकारी मारोती वरभे, तलाठी शंकुतला कोडापे, कृषी सहाय्यक श्रीकांत ठवरे, उमाकांत बोधे उपस्थित होते. आपले सरकार सेतू केंद्रामार्फत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेत नोंदणीधारक शेतकºयांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक प्रशांत कसराळे, सरपंचालन श्रीकांत ठवरे तर आभार उमाकांत बोधे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.अशी आहे शेतकरी योजनाशेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी योजना सुरु झाली आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक शेतकºयाला लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांनी वयाच्या ६० वर्षापर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करण्याची अट आहे. ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकºयांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. यासाठी आधार कॉर्ड, बँक ते पासबुक व शेतीचा आठ अ खाते उतारा आवश्यक असून आपले सरकार सेतू केंद्रामार्फत नोंदणी करावी लागणार आहे. लाभार्थीच्या मृत्यूनंतर देखील कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.शेतकरी मानधन योजनेत १८ वर्षाच्या शेतकऱ्यांने ५५ रुपये महिन्याला जमा केल्यास वर्षाला ६६० रुपये पडते. यानुसार ४२ वर्षाचे २७ हजार ७२० रुपये भरणा करणार ६० वर्षापर्यंत ६० वर्षानंतर वर्षाला ३६ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतील. त्याच प्रमाणे ४० वर्षाच्या, लाभार्थ्यांने दरमहा २०० रुपये भरणा केल्यास २० वर्षापर्यंत ४८ हजार रुपये भरावे लागती. ६० वर्ष झाल्यावर वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांना मृत्यूनंतर वारसाना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे.- प्रशांत कसराळे, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिक