भद्रावती, राजुरात ऐतिहासिक पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:21+5:302021-07-07T04:34:21+5:30

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. यामुळे ...

Historical footprints in Bhadravati, Rajura | भद्रावती, राजुरात ऐतिहासिक पाऊलखुणा

भद्रावती, राजुरात ऐतिहासिक पाऊलखुणा

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. यामुळे या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील.

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय

जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. अनेक अडचणी येतात.

काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क

घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव - गोंडपिपरी, नवेगाव मोरे- पोंभूर्णा, पोंभूर्णा- मूल, पोंभूर्णा- चंद्रपूर, पोंभूर्णा- आक्सापूर- गोंडपिपरी मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे.

केरोसीनअभावी अडचण वाढली

जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले

पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.

पर्यटन सफारी सुरू करा

कोरपना : निसर्ग व वनसंपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पावसात अपघात वाढणार आहेत.

नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी

तळोधी बा. : नागभीड तालुक्यातील नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, अशी मागणी नांदेड ग्रामपंचायतीने केली आहे. तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराकरिता तळोधी बा. येथे यावे लागते. नांदेड हे मध्यवर्ती ठिकाण असून, या सभोवताल ११ गावांचा संपर्क येतो. याठिकाणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे नांदेड ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Web Title: Historical footprints in Bhadravati, Rajura