शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

क्वारन्टाईन लोकांचेच आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : अनेक खोल्या असतानाही एकाच ठिकाणी अनेक व्यक्ती

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यातील कुंभेझरी, दमपूर मोहदा, शेणगाव, धोंडाअर्जुनी, पांढरवणी या खेडेगावातील ७१ नागरिक हे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक येथून आले असून त्यांना जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत क्वारन्टाईन केले आहे. मात्र त्यांच्याकडे तालुका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या लोकांचेच आरोग्य आता धोक्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पुणे, मुंबई सोडून जिवती तालुक्यात परत आले. चार ते पाच दिवसांपासून आलेल्या या लोकांना शासकीय आश्रमशाळा जिवती येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे. परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोरोना हा आजार संसर्गजन्य असला तरी आणि आश्रमशाळेत अनेक खोल्या असल्या तरी अनेक व्यक्तींना वेगवेगळे न ठेवता एकत्र ठेवण्यात आले आहे. क्वारन्टाईन ठेवलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून जेवण दिले जायला पाहिजे. परंतु त्यांच्या घरून जेवणाचा डबा आणून दिला जात आहे. यामुळे इतरांचेही आरोग्य बाधित होण्याची भीती आहे. सर्व वस्तू घरून आणि घरातील कुटुंबांशी संपर्क येत असल्याने क्वारन्टाईन करण्याचा हेतूच दूर लोटला जात आहे. तेथील व्यक्तींना सॅनिटायझर, साबू पुरविले जात नाही.७१ पैकी २८ लोकांची तपासणीजिवती येथील शासकीय आश्रमशाळेत ७१ नागरिकांना क्वारन्टाईन ठेवण्यात आले असून यापैकी २८ नागरिकांना चंद्रपूर येथे तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाठविले. उर्वरित नागरिकांची अजूनही तपासणी करण्यात आलेली नाही. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांचा अहवाल यायचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या