शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे जत्थे परराज्यात

By admin | Updated: May 16, 2015 01:42 IST

१८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या ...

ब्रह्मपुरी : १८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या मध्यस्थीने त्यांना परराज्यात नेऊन अल्पदरात काम करवून घेतले जात आहे. यात काही प्रमाणात त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषणही केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे.शासनाच्या योजना चांगल्या असूनही योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात नसल्याने अनेक बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे घ्यायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. दोन-चार महिने कुठे तरी काम करावे, असा प्रयत्न सुरू असतो. परंतु शहरात व तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती अजूनही झाली नाही व मोठमोठ्या कारखान्याच्या निर्मितीचाही अभाव असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या दुकानात नोकर राहण्यापलीकडे दुसरा रोजगार सध्या तालुक्यात अस्तित्वात नाही. म्हणून बेरोजगारांनी परराज्यात जाऊन काम करणे पसंत केले आहे. भरारमेंढा, किन्ही, किरमिरी (मेंढा) हळदा, आवळगाव व अन्य भागातून अनेक बेरोजगार बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता अशा मोठ्या महानगरात स्थानिक ठेकेदारांच्या मध्यस्थीने नेऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. या कामाचा मोबदला देताना त्यांची काही प्रमाणात शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक शोषणही केले जात असल्याची माहिती परतून आलेले युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. शासनाने अनेक योजनांचा गाजावाजा करुन फक्त कागदावरच त्या गुंडाळलेल्या असल्याने बेरोजगारांना दारोदार भटकंती करण्याची दरवर्षी वेळ येत असल्याचीही भावना बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील जवळजवळ ५०० ते ६०० बेरोजगार युवक विविध कंपन्यांच्या कामावर आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इत्यादी राज्यात कामांना गेल्याचे दिसून येत आहे. एखाद्या दुकानासाठी अथवा व्यवसायासाठी बँकेने कर्ज द्यायचे म्हटले तर अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड काम असते व गॅरंटीचा प्रश्नही समोर उभा राहतो. दुकान किंवा व्यवसाय उभारण्यासाठी बेरोजगारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असते. शासनस्तरावर काही अटी शिथिल केल्यास बेरोजगारांना सहज कर्ज मिळेल, अशी सोय करून देण्याचीही मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. मोठ्या पैशाच्या आमिषाला बळी पडून बेरोजगारांचा हिरमोड होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. सुरुवातीला मध्यस्थी करणारा स्थानिक ठेकेदार कंपनीच्या दारापर्यंत दिसतो. नंतर तो ठेकेदार भूमिगत होत असल्याने बेरोजगारांना परराज्यात वालीच उरत नसल्याने जे मिळेल ते खाऊन आपत्तीचा भार सहन करीत त्यांचे आयुष्य जगणे सुरू असते. विशेष म्हणजे, परराज्यात गेलेल्या या बेरोजगारांच्या असहायतेचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन त्यांच्याकडून अवजड व जादा काम करवून घेत असल्याचीही माहिती आहे. गरजवंत असल्याने हे बेरोजगार याबाबत काहीही बोलत नाही. मजुरी देतानाही त्यात दांडी मारली जाते. बेरोजगारांच्या समस्येकडे शासनाने दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील बेरोजगार युवक करीत आहेत. अन्यथा दिवसेंदिवस बेरोजगारीच्या भस्मासूर वाढून भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्योगांचा अभावस्थानिक पातळीवर स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण होत असतानाही एमआयडीसीची निर्मिती झाली नसल्याने बेरोजगारांना इतर राज्यात कामासाठी जावे लागत असते. ब्रह्मपुरी येथे एमआयडीसीची मागणी जुनी असून फक्त जागा सीमांकित करून फलक लावण्यात आले आहे. परंतु एकही लहान मोठा उद्योग सुरू झाला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून बेरोजगारी वाढली आहे.