शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

By admin | Updated: May 7, 2015 00:58 IST

गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे.

गोवरी : गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे. त्यामुळे निघणारे पाणी हे कोळशासारखे काळे आहे. या काळ्या दूषित पाण्यामुळे गोयेगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून कोळसा खाणींचा नाहक फटका गावकऱ्यांना बसत आहे.राजुरा शहरापासून १० कि.मी. अंतरावरील गोयेगाव हे जेमतेम ९०० लोकसंख्या असलेले गाव. गावात जाताना वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या परिसरातील जमीन काळी कसदार आणि अतिशय सुपीक आहे. मात्र या परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण करून गोयेगाव गावालगत दोन-तीन वर्षापूर्वी गोवरी डीप ही खुली कोळसा खाण सुरू केली.कोळसा उत्खननासाठी खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टींग केले जाते. या ब्लॉस्टींगची क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात असते की भूकंप झाल्यासारखी घरे हलू लागतात. बोअरवेलचे खड्डे ब्लॉस्टींगने खचू लागल्याने त्यातून निघणाऱ्या काळ्या पाण्यावर गोयेगाववासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. गोयेगाव येथील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण टाकी लावण्यात आली. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाचे काम वर्षानुवर्षे थांबलेलेच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जलशुद्धीकरणाकरिता लावलेली टाकी निकामी झाली असून ती आता शोभेची वास्तू ठरली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर जलशुद्धीकरणाचा लाभ गावकऱ्यांना झाला असता. शुद्ध पाण्यापासून गोयेगाववासीय जनता वंचित झाल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना फ्लोराईयुक्त व काळ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. कोळसा खाणींचा नाहक फटका गोयेगाववासीयांना बसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले शेणखतांचे ढिगारे येणाऱ्या - जाणाऱ्या वाटसरूंच्या स्वागतासाठी उभे आहे. पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर शेणखताची दुर्गंधी अस्वस्थ करणारी ठरत असतानाही ते ढिगारे हटविण्याचे सौजन्य ग्रामपंचायतींने दाखविले नाही. गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. मात्र गावाच्या विकासाप्रति उदासीन असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला गावकऱ्यांच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसल्याचे नेहमी दिसून येत आले आहे. (वार्ताहर)