शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी संकटात - सतीश वारजूकर

By admin | Updated: March 19, 2016 00:48 IST

गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले.

भिसी : गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले. परंतु आजही कॅनल त्याच अवस्थेत आहेत. पाणीही आले नाही. कालव्याचे काम पूर्ण झाले नाही. यासाठी जबाबदार व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु चिमूर तालुक्यात शेती सिंचनाची सोय नसल्याने नेहमी शेतकऱ्यांवर संकट येऊन त्यांचे जीवनमान ढासळत आहे. त्यासाठी त्यांना आधार देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी केले.सांस्कृतिक भवन भिसी येथे भिसीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माधव बिरजे होते. उद्घाटक डॉ. अविनाश वारजूकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रा. राम राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय डोंगरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे, घनश्याम डुकरे, दिनेश गावंडे, प्रफुल्ल खापर्डे, ओमजी खैरे, शेषराव भुरके, कादरबाबू शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकर, कदीर शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी तुषार सूर्यवंशी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर डॉ. अविनाश वारजूकर व डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण झाले. तसेच प्रस्तावित कामांचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी कादरबाबू शेख, प्रा. राम राऊत, संजय डोंगरे, डॉ. अविनाश वारजूकर यांची भाषणे झालीत. (वार्ताहर)