शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकवळपेठ परिसरात वाघाची दहशत । तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत चिचाळा कवळपेठ गट ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून वाघाची दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने आठ दिवसात दोन जनावरे ठार तर एक व्यक्ती जखमी झाला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला.चिचाळा व कवळपेठ येथील शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. काही दिवसात रोवणीलाही सुरूवात होईल. शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे अडचणी आल्याने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत गट्टुवार यांच्या नेतृत्वात नागेश टिकले, संजय धोडरे, वासुदेव बरांडे, सुभाष वाढई आदींनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.शेतीभोवती तारांचे कुंपण घालणारचिचाळा-कवळपेठ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले. या भागातील ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्या शेती भोवताल तारा अथवा जाळीचे कुंपण लावण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांनी ‘लोकमत‘ला दिली.तलावात परिसरात दोन शेळ्या ठारसावरगाव : येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वाघाच्या हल्ल्यात गाय ठारमासळ : वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चैती रिठ (टेकाडी मांडवझरी) संरक्षित वनपरिक्षेत्र परिसरात मंगळवारी दुपारी घडली. कोलारा येथील शेतकरी आनंदराव नन्नावरे हे गुरूवारी सकाळी ८ वाजता शेताकडे जात असताना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने शेतकरी बचावले. कोलारा येथील गुराखी वसंता ढोणे हे ताडोबा लगतच्या जगंलालगत गुरे चारण्यासाठी गेले होते. वाघाने गुरांच्या कळपावर केल्याने गाय ठार झाली. शंकर ढोणे व वसंता जांभूळे यांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळाला. घटनेची माहिती कोलारा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना दिल्यानंतर पंचनामा केला. सातारा येथील अक्षय माळवे यांना भरपाई देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग