शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बँकेतून रिकाम्या हाताने परतले

By admin | Updated: June 16, 2017 00:33 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

खरीपाच्या तोंडावर पैसा मिळेना : जास्त रक्कम देण्याला बँकेचा नकारप्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेत शेतकऱ्यांना पैसाच मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती असून शेतकऱ्यांना पैसा देण्यास बँक नकार देत आहे.गोवरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या बँकेत गोवरी परिसरातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांचे खाते आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी बँकेत चकरा मारत असून बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने आल्यापावली परत जावे लागत आहे. बँकेत रक्कम आलीच तर ५ हजार घेऊन जा, दहा हजार रुपयांचा विड्राल केल्यास पैसे मिळणार नाही, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु, बँकेतून पैसेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना बँकेसमोर ताटकळत राहण्याची पाळी आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने बँकेला भेट दिली असता, बँकेत कॅश न आल्याने शेतकऱ्यांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. बँकेतून पैसे मिळावे म्हणून वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना विचारणा केली असता, सध्या आमचा शेतीचा हंगाम आहे. बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बँकेत चकरा मारूनही पैसे मिळात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ त्यांचे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करायला लागला आहे. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेतून पैसाच मिळत नसल्याने हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शेतीचा खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे. बी-बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. पैशासाठी बँकेत गेल्यावर पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती आहे.- गणपत जुनघरी, शेतकरी, गोवरी.जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतून आमच्या बँकेला कमी पैसा मिळतो. प्रत्यक्षात २० लाखांची मागणी असते. परंतु, बँकेला दोन-तीन लाख दिले जाते. त्यामुळे बँकेत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पैसाच येत नसल्याने ग्राहकांना पैसे देणे कठीण झाले आहे.- केशव बोढे, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक, गोवरी.