शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:17 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे.

सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागते. त्यात प्रामुख्याने वेकोलिच्या उत्खननामुळे होणारे मातीचे मोठमोठे ढिगारे व त्यामुळे कृत्रिम पुराचा फटका, होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बसणारे हादरे व त्यामुळे घरांना जाणारे तडे, वेकोलि परिसरात होणारे धुळीचे प्रदूषण, या प्रकारामुळे परिसरातील पिकांचेही नुकसान होत आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्खननामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यातच महत्वाची समस्या म्हणजे कोळसा खाणीतून केल्या जाणाऱ्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था. मोठ्या उत्पादनामुळे वेकोलिला फायदा होत असला तरी नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वेकोलि परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी कोळसा वाहतूक होते. परिसरातील माथरा, गोयेगाव, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, बाबापूर, मानोलीसह अनेक गावातील नागरिक या रस्त्याने वाहतूक करतात.
वेकोलिच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गाची नेहमीच दयनीय अवस्था असते. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. परंतु रस्ता कधीच चांगल्या स्थितीत नसतो. सध्या वेकोलिच्या गोवारी डीप या नव्या कोळसा खाणीमुळे या मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. त्यावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडले आहते. रस्ता पूर्णत: दबल्या गेला आहे. त्यामुळे यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागते. रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरील धुळीवर नियंत्रण करणेही गरजेचे असून रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे. (वार्ताहर)