बांधकाम विभागाच्या कार्यालयात नेले गाढव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:27+5:30
तीनदा उड्डाणपुल्लाच्या बांधकामाचे बजेटसुध्दा वाढविण्यात आले. तरी उड्डाणपुल पुर्ण झाला नाही. दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने रैल्वे फाटक खूप वेळा बंद होत असते. वाहतुकीच्या दृष्टीने राजुरा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर आंद्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात वाहतूक करणारे जडवाहने जात असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा येथील प्रलंबित असलेला रेल्वे उड्डाणपुल त्वरित पूर्ण करण्यात यावा म्हणून सार्वजनीक बांधकाम उपविभागीय कार्यालय राजुरा येथे बाबाराव मस्की यांनी गाढवाला सोबत नेऊन ठिय्या आंदोलन केले.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राजुरा उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. तीनदा उड्डाणपुल्लाच्या बांधकामाचे बजेटसुध्दा वाढविण्यात आले. तरी उड्डाणपुल पुर्ण झाला नाही. दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने रैल्वे फाटक खूप वेळा बंद होत असते. वाहतुकीच्या दृष्टीने राजुरा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर आंद्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात वाहतूक करणारे जडवाहने जात असतात. त्यामुळे सर्वांना तासनतास गेट उघडण्याची वाट बघावी लागते. चंद्रपूरकडे जाणाऱ्या रुग्णांची गैसोय होत असते. तेरा वर्षापूर्वी उड्डाणपुल मंजुर झाला. परंतु आतापर्यंत पुर्ण झाला नाही. विदर्भ प्रेमी संघटनेचे बाबाराव मस्की यांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय येथे आंदोलन केले. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. दरम्यान, आज सोमवारी बाबाराव मस्की यांनी चक्क गाढवच उपविभागीय बांधकाम कार्यालयात नेले. व तिथेच ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर मस्की यांनी आपल्या मागणीचे निवेदन बांधकाम अभियंत्यांना दिले.