शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: May 16, 2015 01:39 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार मागील काही दिवसांपासून आटल्याने वरोरा शहरवासियांना एक दिवसाआड नदीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात ...

वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार मागील काही दिवसांपासून आटल्याने वरोरा शहरवासियांना एक दिवसाआड नदीच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या जलसंकटामुळे ट्युबवेलच्या पाण्यावर वरोरा शहरातील नागरिकांना तहान भागावावी लागत आहे.वरोरा शहरातील अनेक प्रभागात वर्धा नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना पालिका प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येते, तर उर्वरित प्रभागात ट्युबवेलने पाणी तर रेल्वे लाईनच्या नागपूर- चंद्रपूर मार्गालगतच्या वरोरा नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या वसाहतीमध्ये बोर्डा गावानजीकच्या विहिरीतून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वरोरा शहरात वर्धा नदीच्या तुळाना गावालगतच्या घाटावरुन पाणी पुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या पाण्याची धार आटली असल्याने पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करुन नागरिकांना ट्युबवेलद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ट्युबवेल व नदीचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसात पोहचत नाही, अशा ठिकाणी शहरात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वरोरा नगर परिषदेने वर्धा जिल्ह्यातील धरणातील पाणी आरक्षित केले, त्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही धरणातून पाणी सोडले नाही. सध्या आठ दिवस पुरेल असा पाणी साठा नदीतील पाणी पुरवठा यंत्रणेजवळ उपलब्ध आहे. परंतु हा साठा या पेक्षाही कमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मे महिन्याचे उर्वरित दिवस व जून महिन्यातील पहिला आठवड्यापर्यंत वरोरा शहर वासीयांना नदीचे पाणी मिळविण्याकरीता भटकंती करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)नदीतील डोह वरदानवर्धा नदीतील पाण्याची धार पुर्णत: आटली आहे. वर्धा नदीमध्ये असलेल्या वरोरा नगरपरिषदेच्या यंत्राजवळ पाणी शिल्लक नाही. या यंत्रानजीकच्या एक ते दीड किमी अंतरावर वर्धा नदीच्या पात्रात असणाऱ्या डोहामधून पाण्याची धार काढून त्या यंत्रापर्यंत पोहचविण्याची कसरत मागील काही दिवसांपासून नगर परिषद प्रशासन करीत आहे. त्यामुळे वर्धा नदीच्या पात्रातील डोह सध्यातरी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.पाण्याचे आरक्षण तरीपण पाणी नाहीवरोरा नगर परिषदेच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील धरणातील पाणी काही महिन्यापूर्वी आरक्षित केले ते पाणी वर्धा नदीतून सोडण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु अद्यापही पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. वर्धा नदीवर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित केले असेल तर आरक्षित करणाऱ्याच्या पत्राची वाट पाहून एकत्रित पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आहे.