शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

कोळसा उपलब्ध; टळले महानिर्मितीचे संकट, चंद्रपूर वीज केंद्रात आठवडाभराचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 12:07 PM

राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे.

राजेश मडावी

चंद्रपूर : उन्हाची तीव्रता घसरू लागल्याने विजेची मागणी थोडी कमी झाली आहे. त्यामुळे कोळसा टंचाईने हैराण झालेल्या महानिर्मितीवरील संकटही काही प्रमाणात टळले आहे. राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे.

महानिर्मितीचे राज्यात सात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. या केंद्रातून दररोज सव्वा लाख ९५४० मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते. मात्र, मार्च २०२२ पासून देशात कोळसा टंचाई सुरू झाल्याने महानिर्मितीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. दैनंदिन कोळशाची गरज सव्वा लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना कोळसा कंपन्यांकडून केवळ ८०-८५ मेट्रिक टन कोळसा मिळत होता. त्यामुळे वीज केंद्रांवरील काेळशाचा साठा एक दिवस पुरेल एवढा घसरला.

वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा

कोराडी, नाशिक, भुसावळ, परळी, पारस, चंद्रपूर, खापरखेडा या चार वीज केंद्रांतून राज्यात वीजनिर्मिती सुरू आहे. यातील चंद्रपूर व काेराडी केंद्रात सहा दिवसांचा कोळसा उपलब्ध आहे. परळी व भुसावळ केंद्रात सर्वाधिक १० ते ११ दिवस पुरेल एवढा कोळसा आहे. नाशिक दोन दिवस, तर खापरखेडा वीज केंद्रात पाच दिवस पुरेल एवढा कोळसा असल्याने फार अडचण येणार नाही, असा अंदाज महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटchandrapur-acचंद्रपूर