शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमुरातील किल्ला मैदान ठरले ऑगस्ट क्रांतीचे केंद्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 1:26 PM

‘करा व मरा’चा नारा पोहोचला होता चिमुरात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून दिला संदेश

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीडशे वर्षाची इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ हा नारा दिला. या नाऱ्याने संपूर्ण देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पसरला. हाच नारा चिमुरातील किल्ला मैदानात पोहोचला आणि क्रांतिकारक पेटून उठले. या क्रांतीचे गवालिया टँक व चिमुरातील किल्ला मैदान हे क्रांतीचे शक्तीस्थळ ठरले होते. 

अभ्यासक्रमात व्हावा समावेश

विदर्भातील चिमूर (चंद्रपूर), आष्टी (वर्धा), यावली (अमरावती), बेनोडा येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्यांची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही. इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून १९४२मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.

१३ ऑगस्टला निघाली होती प्रभातफेरी

मुंबईत ८ ऑगस्टला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना केली. ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. करेंगे या मरेंगे हा महात्मा गांधीजींचा आदेशरूपी संदेश चिमुरात ९ ऑगस्टला पोहोचला. १० ऑगस्टला वर्धा येथे अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली. यात इंग्रजांनी जंगलू हमाल या स्वातंत्र्यवीराला ठार केले. ही घटना चिमूर येथील उद्धवराव कोरेकार यांनी प्रत्यक्ष पाहिली. 

१२ ऑगस्टला कोरेकार चिमूर येथे येताच त्यांनी गणपत सावरकर यांच्या घरी सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली. १३ ऑगस्टला मोठी प्रभातफेरी काढण्याचे ठरले. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून चिमूर येथे घडलेल्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांतून क्रांतीची बीजे पेरण्यात आली आणि किल्ला मैदानातून १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमुरात रणसंग्राम पेटला होता. या लढ्याच्या आठवणी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ताज्या होतात.

टॅग्स :historyइतिहासchimur-acचिमूरchandrapur-acचंद्रपूर