शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी करणाऱ्यांमधून ९३ टक्के लोक निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देचाचण्यांना घाबरू नका, सोबत काळजीही घ्या : केवळ सात टक्केच लोकच निघाले पॉझिटिव्ह

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रशासनाने चाचण्यांचाही वेग वाढविला आहे. मात्र चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोरोना चाचणी केली तर पॉझिटिव्ह निघेल, या भीतीपोटी अनेकजण चाचणी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील चाचण्यांच्या व त्याच्या अहवालाच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर कोरोना चाचणी करणाऱ्यांपैकी तब्बल ९२.७७ नागरिक निगेटिव्ह निघाले आहेत. यावरून चाचणीबाबतची लोकांच्या मनातली भीती अनाठायी असल्याचे स्पष्ट होते.प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९५ हजार ८६३ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९४ हजार ३३८ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या एक हजार ५२५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ३१ हजार ४५५ चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर २९ हजार ९३८ चाचण्या अ‍ॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ५६ हजार ९५७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर तीन हजार ४४६ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. टक्केवारीचा हिशोब केला तर तब्बल ९२.७७ टक्के नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासोबतच चाचण्यांबाबतची भीती बाजुला सारून लोकांनी सौम्य लक्षणेही आढळल्यास मोकळे मनाने चाचणी करून घेणे गरजेचे आणि त्यांच्याच हिताचे आहे.चाचण्यांबाबतचा गैरसमज दूर करासमाजात कोरोना चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर तर ‘कोरोना कशामुळे होतो, तर तो चाचणी केल्याने होतो’ असा चुकीचा मॅसेज वायरल केला जात आहे. चाचणी केलेल्यांमधून ९२.७७ टक्के नागरिक निगेटिव्ह आले आहेत.आ. जोरगेवारांच्या प्रकृतीत सुधारणाचंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. यात ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून लोकमतला सांगितले. चार-पाच दिवसात कोरोनातून बरे होऊच चंद्रपूरला परत येईन, असेही ते म्हणाले. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.अ‍ॅन्टिजेनमुळे वाढल्या चाचण्यापूर्वी कोरोनाची चाचणी नागपूर येथील प्रयोगशाळेत केली जात होती. संशयित रुग्णाचा स्वॅब घेऊन तो नागपूरला पाठविला जात होता. दोन दिवसानंतर त्याचा अहवाल यायचा. त्यामुळे तेव्हा केवळ संशयिताचीच चाचणी केली जात होती. मात्र त्यानंतर चंद्रपुरातच युध्दपातळीवर कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅन्टिजेन चाचण्याही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे आता चाचण्यांचा वेग वाढला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या