शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

30 हजार नागरिक कोरोनावर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. वर्षभरात ३ लाख २९ हजार ८४६ जणांनी तपासणी करून घेतली. यामध्ये २ लाख ८० हजार १४९ नागरिकांना कोरोनाचा साधा स्पर्शसुद्धा झाला नाही.

ठळक मुद्देकोरोनाला हरविण्याची जिद्द : प्रबळ इच्छाशक्ती, वेळीच औषधोपचारांने झाले शक्य

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. जो-तो यावर बोलू लागला आहे. त्यातच रुग्णालयात जागा नाही, औषधोपचार नाही, इंजेक्शन नाही अशा सर्व नकारात्मक गोष्टींचाच पाढा वाचला जात आहे. असे असतानाच यातूनही मार्ग काढत जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल ३० हजार ६५० नागरिकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, योग्यवेळी औषधोपचार, प्रशासनासह आरोग्य विभागाचे प्रयत्न यासोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोना नाही तर आपणच भारी, असा विचार करून कोरोना आजारावरही विजय मिळविता येतो, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.मागील वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दहशत कायम नागरिकांच्या मनात घर करून आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाने धडक दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. वर्षभरात ३ लाख २९ हजार ८४६ जणांनी तपासणी करून घेतली. यामध्ये २ लाख ८० हजार १४९ नागरिकांना कोरोनाचा साधा स्पर्शसुद्धा झाला नाही. दरम्यान, सोशल डिस्टन्स, मास्क न वापरणे तसेच बेफिकिरीमुळे तसेच चुकून कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ४२ हजार २३१ आहे. यामध्येही ३० हजार ६५० नागरिकांनी कोरोनाला केव्हाच हरविले असून यावरही त्यांनी विजय मिळविला आहे. हा विजय मिळविण्यासाठी त्यांची प्रबळ इच्छाशक्ती हे एकमेव कारण आहे. यासोबतच वेळीच औषधोपचार, डाॅक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तसेच प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजना यासाठी कामी आल्या आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत नाही तर त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, राज्य शासन, प्रशासनाने लावून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करून कोरोनावरही आपल्याला भारी होता येते, हे आता दाखवून दिले पाहिजे.

 कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. ही आधीपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. पण अशा परिस्थितीत घाबरून न जाता मन शांत व स्थिर ठेवून कोरोनाचा सामना केला पाहिजे. आपल्या मानसिक स्थितीचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर पडतो. आपण घाबरलो, सतत चिंताग्रस्त राहिलो तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे कोरोना झाल्यास मन शांत ठेवून सकारात्मक वृत्तीने डाॅक्टरांच्या सल्याने योग्य ते उपचार केल्यास कोरोनावर मात करू शकतो.- डाॅ. विवेक बांबोळेमानसिक आरोग्य तज्ज्ञ, चंद्रपूर 

वेळीच घ्या दक्षताकोरोना आजार बरा होतो. यासाठी प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षण दिसताच वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. अंगावर ताप, दुखणे न काढता जवळच्या आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घ्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या