शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:29 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा कारभार कागदावरच : खत खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकºयांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.चौरास भागात पाणी असले तरी आजही अनेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात.त्यामुळे निसर्गाच्या कृपेवरच शेतकरी अवलंबून आहे.परिसरात अजून दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत.काही ठिकाणी सिंचन सुविधा असणारे शेतकरी पऱ्हे टाकण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. कोरडवाहू शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दररोज आकाशात ढग गोळा होतात पण पाऊस मात्र पडत नाही. सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे शेतशिवारात काडीकचरा जमा करणे, धुरे पेटविणे यासारखी कामे शेतकरी सकाळच्या वेळेत करतानाचे चित्र दिसत आहे.बैलजोड्यांची संख्या घटल्याने शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. कोंढा परिसरात गेल्या तीन वर्षापासुन कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाने दगा दिल्याने धान उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतीव्यवसाय परवडत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम पूर्व सभा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असताना कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हा, तालुक्याच्या वरीष्ट अधिकाºयांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.पीक कर्जासाठी लगबगकोंढा परिसरात शेतकरी शेती हंगामासाठी पैशाची जमवाजमव करताना दिसून येत आहे. विविध सेवा सहकारी संस्था, तसेच सहकारी बँक व बँक आॅफ इंडियासह ईतर बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जासाठी प्रथम प्राधान्य सेवा सहकारी संस्थेला आहे.कारण येथे शेतकºयांना वर्षाकाठी फक्त मुद्दलच जमा करावे लागते. ईतर बँकेतव्याजसहीत मुद्दल जमा करावे लागते. कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करतात. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ न केल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्ल प्रचंड नाराजी आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.खते, बियाण्यांच्या किंमती वधारल्याबियाण्यांच्या किंमतीत दरवर्षीच वाढ होत आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आपल्याला कमी किंमतीत कोणते बियाणे मिळेल याच्या शोधात असतो. कोंढा परिसरात बोगस बियाणे, किटकनाशकांची छुप्या पद्धतीने विक्री सुरु असल्याची चर्चा आहे.यावर आळा घालण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.परंतु तसे होताना दिसत नाही.अनेक कृषीकेंद्र धारक पक्की बिले देत नसतानादेखील कृषि अधिकारी डोळेझाक करताना दिसून येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी