शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे पानमळा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण ...

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पानमळे जगविण्यासाठी हे शेतकऱ्यासाठी फार जोखमीचे झालेले असतानासुद्धा काही शेतकरी परंपरागत व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मासरूळ, धामणगाव, पारद, वालसावंगी परिसरात तीनशे ते चारशे पानमळे होते. मात्र, आता फक्त ७० ते ८० पानमळे याठिकाणी जिवंत आहेत. त्यांचेसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पान उत्पादन करणे थांबवावे का, या विचाराने शेतकऱ्यांना पछाडले आहे.

पान उत्पादन करणे अत्यंत कठीण आहे. शेतकरी अनंत अडचणींचा सामना करून पान उत्पादन घेत आहेत. मात्र, पान उत्पादनाबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते. वादळ, वारा, गारपीट यापासून पानमळा संरक्षण करण्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पानवेलीचा फळ उत्पादनामध्ये समावेश करावा.

-दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य, बुलडाणा

इतर पिकांना विमा कवच प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे पानवेलींनासुद्धा विमा कवच द्यावे, ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना तात्काळ विमा कवच व वार्षिक अनुदान देण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, नसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनासाठी आम्ही सक्रिय राहू.

-शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, मासरूळ

पान उत्पादन हा परंपरागत व्यवसाय असून, याला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने मदत करावी. पीक विमा कवच देण्याची गरज आहे. भविष्यात पानमळे जिवंत पाहण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-संदीप काटोले, मासरूळ