शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळीतून जास्त पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: December 25, 2014 23:59 IST

शेतकरी संघटनेची पाण्याच्या योग्य नियोजनाची मागणी.

चिखली (बुलडाणा) : दुष्काळ व आगामी काळातील तीव्र पाणीटंचाईचे चित्र पाहता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन होणे आवश्यक असताना अधिकार्‍यांच्या दूर्लक्षामुळे पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी उचल पाण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी शेतकर्‍यांना शेतीला किती प्रमाणावर लागते याचे नियोजन करून योग्य प्रमाणात सोडणे आवश्यक आहे. परंतू तसे न करता पाणी सोडायचे म्हणून सोडल्या जात असल्याने कालव्यातील शिल्लक पाणी वाया जात आहे. सध्या वातावरणात गारवा असल्यामुळे पिकांना पाणी कमी प्रमाणात लागते मात्र याकडे अधिकार्‍यांचे साफ दूर्लक्ष असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेने केला आहे. या हलगर्जीपणामुळे धरण साठय़ातून पाणी उचलून आपल्या पिक वाचविणार्‍यांना नंतर धरणात पाणी शिल्लक राहत नाही व पाण्यावाचून पिके वाया जातात, असेही शेतकरी संघटनेने म्हटले असून कालव्यातून सोडल्या जाणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, रतीराम शेळके, राजु शेटे, मुरलीधर येवले यांनी केली आहे.