शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली ...

साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली जात आहे़ यावर अन्न व औषध प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शे. शफी तांबोळी यांनी केली आहे.

गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या जोखंडात किरकोळ विक्रेते , मजूर , कापड व्यावसायिक सापडलेले आहेत. त्यामुळे या व्यवसायिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शासन केव्हाही लाॅकडाऊन जाहीर करते, तेव्हा किराणा दुकान वगळता इतरांच्या दुकानाचे शटर बंद करते . हे शटर बंद करताना साठवलेल्या मालाचे करायचे काय ! मोठ्या व्यापाऱ्यांची देणी चुकती कशी करायची , मजुरांना पगार कोठून द्यायचा , आणि हा सर्व प्रपंच झाल्यानंतर कुटुंबाचे आर्थिक नियोजन करायचे कसे? असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत आहे . बॅंकांचे हप्ते थकल्याने कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली असताना आज पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागत आहे . किराणा दुकानात किराणा घ्यायला गेलो तर तेलाचे भाव एका वर्षात ८० वरुन १५० वर गेले आहेत . शेंगदाणे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत यावर प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा होणारा काळाबाजार थांबवावा आणि इतर व्यावसायिकांना पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त थोडी सवलत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शे. शफी शे. गुलाब तांबोळी यांनी केली आहे .