शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘रुर्बन’चा ‘सीजीएफ’ आराखडा ३० कोटी रुपयांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:59 IST

३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली.

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दशकात ग्रामीण लोकसंख्येत १२ टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरी तथा ग्रामीण भागातील विकासाचा असमतोल दुर करण्यासाठी देशात राबविण्यात येणाऱ्या रुरअर्बन अभियानातर्गंत निवड झाल्या सुलतानपूर जिल्हा परिषद गटाच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासासाठी बनविण्यात आलेल्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली असून लवकरच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी याचा डिपीआर पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावामध्ये आतापर्र्यंत २७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून ही कामे करण्यात आली आहेत. दरम्यान, ज्या विकास कामांना कुठल्याही अस्तित्वात असलेल्या योजनेतून निधी उपलब्ध होत नाही, अशा कामांसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत क्रिटीकल गॅप फंडींग (उणिवा निवारण निधी) अंतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांचा वकास आराखडा तयार करून त्यास राज्य व केंद्राची मान्यता घेतून पायाभूत विकासाची कामे करण्यावर भर दिला जात आहे. त्यातंर्गतच सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावांच्या विकासाठी ३० कोटी रुपयांचा हा आराखडा बनविण्यात आला आहे.
त्यास राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३० डिसेंबर रोजीच मान्यता दिली आहे. मात्र त्यात काही सुधारणा सुचविल्यामुळे अद्याप केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी हा डिपीआर पाठविण्यात आलेला नाही. त्यात सुधारणा करून तो पाठविण्यात येणार आहे.


सर्जिक कॉटन युनीट प्रस्तावित
नव्या डिपीआरनुसार सुलतानपूर येथे सर्जिकल कॉटन निर्मितीसाठी एक युनीट प्रस्तावित करण्यात आले आहे. सोबतच अ‍ॅग्रो मॉल प्रस्तावीत असून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती या गटातील १३ गावात कशी करता येईल, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, अस्तित्वात असेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण करून या गटात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवळपास १२२ कोटी रुपयांचा कन्वहर्जन आराखडा आहे.


दोन मार्चला मुंबईत बैठक
येत्या दोन मार्च रोजी सीजीएफ अंतर्गतच्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासंदर्भात ग्रामविकास विभागच्या वतीने मुंबईत बांधकाम भवनामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात येत असून रुरअर्बन योजनेतंर्गत समाविष्ठ असलेल्या गाव समुहाच्या पायाभूत विकासासाठी आणखी काय करता येऊ शकते, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा